शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:00 IST

मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमारुती चितमपल्ली : तीन दिवसीय ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात. ते त्याला नकार देतात. कारण असे पक्षीकोश छापायला पैसे खूप लागतात. मग त्यांची किंमत वाढते आणि ग्राहक मिळत नाहीत. मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व एमईसीएलतर्फे खामल्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित ग्रामायण या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मेरा गाव मेरा तीर्थ असे ब्रिद असलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, डॉ. विलास डांगरे, अनिल सांभरे, नारायण मेहरे, आर. एन. झा उपस्थित होते. चितमपल्ली पुढे म्हणाले, पक्षीकोश, प्राणीकोश लिहून झाले आहे. वृक्षकोश आणि मत्स्यकोसाचे काम सुरू आहे. हे लिखाण फार कठीण आहे. माझ्याशिवाय ते इतर कुणीच करू शकणार नाही. मलाही इतके लिहिताना त्रास होतो. पण, निबीड अरण्यातील ज्ञानाचा हा खजिना नवीन पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी माझी ही सर्व धडपड आहे. महापौर म्हणाल्या, गावातील तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला तर ते शहरात येणार नाहीत. शेतकºयांचे आर्थिक चित्र बदलायचे असेल तर अशा प्रदर्शनांचे आयोजन सातत्याने व्हायला हवे. कांचन गडकरी म्हणाल्या, निसर्ग आपल्याला सर्व काही देतो आणि आपण निसर्गाचेच नुकसान करतो. हे योग्य नाही. आता शहरातील लोक शांततेच्या शोधात गावाकडे जात आहेत. दिल्ली की धापेवाडा असा प्रश्न मला कुणी विचारला तर मी धापेवाड्याला पसंती देईल. कारण, तिथे शांती आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कला ते उद्योग असा प्रवास व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संचालन कविता भोपळे तर आभार चंद्रकांत रागीट यांनी मानले. या प्रदर्शनात अनेक ग्रामीण कलावंतांच्या कलाकृती पाहता येणार आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर