शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:00 IST

मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमारुती चितमपल्ली : तीन दिवसीय ग्रामायण प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात. ते त्याला नकार देतात. कारण असे पक्षीकोश छापायला पैसे खूप लागतात. मग त्यांची किंमत वाढते आणि ग्राहक मिळत नाहीत. मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व एमईसीएलतर्फे खामल्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित ग्रामायण या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मेरा गाव मेरा तीर्थ असे ब्रिद असलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, डॉ. विलास डांगरे, अनिल सांभरे, नारायण मेहरे, आर. एन. झा उपस्थित होते. चितमपल्ली पुढे म्हणाले, पक्षीकोश, प्राणीकोश लिहून झाले आहे. वृक्षकोश आणि मत्स्यकोसाचे काम सुरू आहे. हे लिखाण फार कठीण आहे. माझ्याशिवाय ते इतर कुणीच करू शकणार नाही. मलाही इतके लिहिताना त्रास होतो. पण, निबीड अरण्यातील ज्ञानाचा हा खजिना नवीन पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी माझी ही सर्व धडपड आहे. महापौर म्हणाल्या, गावातील तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला तर ते शहरात येणार नाहीत. शेतकºयांचे आर्थिक चित्र बदलायचे असेल तर अशा प्रदर्शनांचे आयोजन सातत्याने व्हायला हवे. कांचन गडकरी म्हणाल्या, निसर्ग आपल्याला सर्व काही देतो आणि आपण निसर्गाचेच नुकसान करतो. हे योग्य नाही. आता शहरातील लोक शांततेच्या शोधात गावाकडे जात आहेत. दिल्ली की धापेवाडा असा प्रश्न मला कुणी विचारला तर मी धापेवाड्याला पसंती देईल. कारण, तिथे शांती आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कला ते उद्योग असा प्रवास व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संचालन कविता भोपळे तर आभार चंद्रकांत रागीट यांनी मानले. या प्रदर्शनात अनेक ग्रामीण कलावंतांच्या कलाकृती पाहता येणार आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर