शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

शासकीय कार्यालयांत एसएनडीएलचा अंधार!

By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST

सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय इमारत क्रमांक २ मधील सर्व शासकीय कार्यालये गत दोन दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. गत दोन दिवसांपासून या इमारतीमधील वीजपुरवठा

 नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय इमारत क्रमांक २ मधील सर्व शासकीय कार्यालये गत दोन दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. गत दोन दिवसांपासून या इमारतीमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. माहिती सूत्रानुसार, बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडचे (एसएनडीएल) ट्रान्सफॉर्मर पूर्णत: जळून खाक झाले. त्यामुळे येथील संपूर्ण वीजपुरवठा अचानक खंडित होऊन सर्व शासकीय कार्यालये जागीच थांबले. सर्व कार्यालयांमधील लाईट, संगणक, कूलर व पंख्यासह तिन्ही लिफ्ट बंद झाल्या होत्या. या बहुमजली इमारतीमध्ये सामाजिक वनीकरण, विभागीय कृषी कार्यालय, आदिवासी विकास, जात पडताळणी, माहिती अधिकार, अन्न व औषधी प्रशासन आणि स्वयंरोजगार विभागासह अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. मात्र गत दोन दिवसांपासून या सर्व कार्यालयांमधील वीजपुरवठा खंडित असल्याने, येथील सर्व कामकाज ठप्प पडले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत येथील वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. एसएनडीएलने गुरुवारी येथील जळालेले ट्रान्सफॉर्मर काढून तेथे नवीन बसविले. परंतु तरीही रात्री उशिरापर्यंत या इमारतीमध्ये वीजपुरवठा पोहोचलेला नव्हता. विशेष म्हणजे, येथील अनेक कार्यालयांत अपंग अधिकारी व कर्मचारी काम करतात. बुधवारी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील तिन्ही लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे अनेक जण रात्री उशिरापर्यंत कार्यालयात अडकून पडले होते. शेवटी रात्री उशिरा एक लिफ्ट सुरू करून, त्या सर्व कर्मचार्‍यांना खाली उतरविण्यात आले. दुसरीकडे बुधवारी नागपुरातील तापमानाने यंदाचा उच्चांक गाठून ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. अशास्थितीत येथील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिवसभर अंधारासोबतच गरमीचाही सामना करावा लागला. त्यामुळे अनेक कर्मचारी कार्यालयाबाहेरील पोर्चमध्ये खुर्च्या टाकून बसलेले दिसून येत होते. तसेच विभागीय कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा वेगळाच मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी दुपारी या कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी खरीप आढावा बैठकीची पूर्वतयारी करीत होते. परंतु दुपारी ३ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्व संगणक बंद पडले होते. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.(प्रतिनिधी)