शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नानासाहेबांच्या स्मारकाचा शासनाला विसर

By admin | Updated: May 3, 2015 02:08 IST

नानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे.

राजेश पाणूरकर नागपूरनानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे. नानासाहेबांच्या नसण्याने सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात एक रितेपणा आला आहे. हे रितेपण सहजासहजी संपणारे नाही. नानासाहेबांच्या नसण्याने माणसांची एक समृद्ध मैफिल मुकी झाली. नानासाहेबांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून तत्कालीन राज्य शासनाने त्यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली. महानगरपालिकेनेही स्मारक निर्माण करण्यासाठी रस दाखविला. आज तब्बल सहा वर्षे झाली पण शासनाला आणि मनपालाही राम शेवाळकरांचाच विसर पडला आहे.नागपुरातील कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस आणि प्राचार्य राम शेवाळकर यांच्यावर जगातील तमाम मराठीच नव्हे तर इतर भाषिक रसिकही प्रेम करतात. सुरेश भटांच्या नावाचे सभागृह किती गांभीर्याने घेतले जाते आहे, ते सांगायला नको. कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचारही केला गेला नाही. प्राचार्य राम शेवाळकरांच्या निधनानंतर मात्र त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी घोषणा झाल्या. तत्कालीन वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी प्राचार्य राम शेवाळकर स्मृती स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले. महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. सहा वर्षापूर्वी नागपुरातील काही जागांची पाहणीही करण्यात आली पण त्यानंतर मात्र काहीही झाले नाही. नानासाहेबांचा विसर शासनालाही पडला आणि महानगरपालिकेलाही त्याचे काहीच वाटले नाही. आता तर हा विषय पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे. इंग्लंड मध्ये कुणीही शेक्सपिअरचा अपमान करू शकत नाही. जगभरात कुठेही शेक्सपिअरबद्दल अवमानजनक कुणी बोलले, लिहिले तर इंग्लंडच्या संसदेत निषेध ठराव पारित केला जातो. शेक्सपिअर आमच्या नसानसांमधून वाहतो, असा स्वाभिमान इंग्लंडचे लोक ठेवतात. पण आपण आपल्याच थोर साहित्यिकांबद्दल सन्मान ठेवत नाहीत. नाशिकला कुसुमाग्रजांचा स्वाभिमान आहे. पुण्यात पु. ल. देशपांडेंच्या नावाने अकादमी आहे. नागपुरात कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस, प्राचार्य शेवाळकर ही मोठ्या उंचीची माणसे होऊन गेलीत पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात सन्मानपूर्वक आस्था का नसावी? नागपूर महानगरपालिका सांस्कृतिक दृष्टी ठेवणारी आहे, असे बोलले जाते. महापालिकेद्वारेही तसा दावा केला जातो. पण अवघ्या सहा वर्षात प्राचार्य राम शेवाळकरांचा मनपाला विसर का पडावा? प्रत्येक बाबींसाठी सामान्य रसिक, नागरिकांनी मनपाच्या पायऱ्या झिजवल्या तरच निगरगट्ट प्रशासन त्याची दखल घेईल, असे सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या मनपाला का वाटावे?आता सरकार बदलले आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. प्राचार्य राम शेवाळकरांची प्रतिभा आणि उंची त्यांना व्यक्तीश: माहीत आहे. त्यांच्या नावाचे स्मारक नागपुरात व्हावे म्हणून मुख्यमंत्री पुढाकार घेणार का? यापूर्वीच्या सरकारने केलेली घोषणा ते पूर्ण करू शकतात.प्राचार्य शेवाळकरांच्या निधनानंतर किमान त्यासाठी प्रयत्न सुरू राहिले असते तर समजून घेण्यासारखे होते. पण आभाळाएवढ्या उंचीच्या प्राचार्य राम शेवाळकरांचा आम्हाला विसर पडावा, हा सांस्कृतिक करंटेपणाच नाही का? त्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राज्य शासन आणि महानगरपालिकेने यासंदर्भात गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे मत सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.