शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

बालमजुरीबाबत शासकीय यंत्रणाच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:42 IST

बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआज बालमजुरी निर्मूलन दिननिर्मूलन होणार तरी कसे? : कायदेच लंगडे झाले

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यांवर, सोनार ओळीत, किराणा ओळीत, भांडेवाडीत कचरा वेचताना, अगरबत्ती उद्योग, वरातीसमोर दिवे घेऊन चलणारे, पतंग व्यवसाय, पूजेचे नारळ तयार करणे, झालर व दरवाजाचे तोरण तयार करणे, काचपत्रे शिशा, लोखंड गोळा करणे, बांधकाम आदी ठिकाणी आपल्याला अनेक छोटू नावाचे बालमजूर आढळून येतात. या बालमजुरांबाबत मालकाकडे विचारणा केली तर यांच्या भरवशावरच त्यांचे घर चालते? असे उत्तर मिळते. ही बाब काही प्रमाणात खरीही असते. पालकांना विचारले तर वेगळाच सूर असतो. दिवसभर इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा दोन पैसे घरात आले तर चांगलेच आहे, असे सांगितले जाते.नागपुरातील असंघटित कामगारांचे नेते हरीश धुरट यांनी दिलेली माहिती तर अतिशय धक्कादायक अशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बालमजुरी याकडे कुणाचेच लक्ष नाही. ना शासन याबाबत काही बोलायला तयार आहे ना प्रशासनाकडे यासाठी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात तब्बल ३० हजारावर बालमजूर आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी कायदे होते. परंतु आता कायदाच लंगडा करण्यात आलेला आहे. बालमजुरी निर्मूलन कायद्यानुसार तक्रारीनुसार एखाद्या हॉटेल किंवा प्रतिष्ठानावर धाड टाकली किंवा निरीक्षण केले आणि त्या ठिकाणी मजुरी करताना एखादा बालक आढळून आल्यास त्याच ठिकाणी मालकाला २५ हजार रुपये दंड भरावा लागत असे.

 

टॅग्स :nagpurनागपूर