शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

बालमजुरीबाबत शासकीय यंत्रणाच उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:42 IST

बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआज बालमजुरी निर्मूलन दिननिर्मूलन होणार तरी कसे? : कायदेच लंगडे झाले

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालमजुरी हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण जगात सर्वाधिक बालमजूर भारतात सापडतात, हे वास्तव आहे. नागपूर शहरातही आपल्याला विविध ठिकाणी बालमजूर काम करताना सरास नजरेस पडतात. गरिबी आणि घराची आवश्यकता म्हणून नाईलाजास्तव लहान वयातच मुलांना मजुरी करणे भाग पडते त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण हिरावले जाते. यातून अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. यामुळे बालमजुरीच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनाही आहे. तरीही बालमजुरी कायम आहे. कारण कायदे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र उदासीन आहे. आता तर कायदाच लंगडा करण्यात आल्याने बालमजुरीचे निर्मूलन होणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यांवर, सोनार ओळीत, किराणा ओळीत, भांडेवाडीत कचरा वेचताना, अगरबत्ती उद्योग, वरातीसमोर दिवे घेऊन चलणारे, पतंग व्यवसाय, पूजेचे नारळ तयार करणे, झालर व दरवाजाचे तोरण तयार करणे, काचपत्रे शिशा, लोखंड गोळा करणे, बांधकाम आदी ठिकाणी आपल्याला अनेक छोटू नावाचे बालमजूर आढळून येतात. या बालमजुरांबाबत मालकाकडे विचारणा केली तर यांच्या भरवशावरच त्यांचे घर चालते? असे उत्तर मिळते. ही बाब काही प्रमाणात खरीही असते. पालकांना विचारले तर वेगळाच सूर असतो. दिवसभर इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा दोन पैसे घरात आले तर चांगलेच आहे, असे सांगितले जाते.नागपुरातील असंघटित कामगारांचे नेते हरीश धुरट यांनी दिलेली माहिती तर अतिशय धक्कादायक अशी आहे. गेल्या दोन वर्षांपासून बालमजुरी याकडे कुणाचेच लक्ष नाही. ना शासन याबाबत काही बोलायला तयार आहे ना प्रशासनाकडे यासाठी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात तब्बल ३० हजारावर बालमजूर आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी कायदे होते. परंतु आता कायदाच लंगडा करण्यात आलेला आहे. बालमजुरी निर्मूलन कायद्यानुसार तक्रारीनुसार एखाद्या हॉटेल किंवा प्रतिष्ठानावर धाड टाकली किंवा निरीक्षण केले आणि त्या ठिकाणी मजुरी करताना एखादा बालक आढळून आल्यास त्याच ठिकाणी मालकाला २५ हजार रुपये दंड भरावा लागत असे.

 

टॅग्स :nagpurनागपूर