शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

आंतरजातीय विवाह योजनेबाबत शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:38 IST

समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देदोन वर्षानंतर मिळाला निधी : कशी राबवणार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. या योजनेसाठी मिळणारा निधी तब्बल दोन वर्षानंतर केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आला तो सुद्धा कमीच. अशा परिस्थितीत आंतरजातीय विवाहाबाबत केंद्र शासन खरच गंभीर आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनुसूचित जाती, जमाती वर्गातील व्यक्तीसोबत इतर समाजाच्या व्यक्तीने लग्न केल्यास संबंधित जोडप्यास ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. समाजासमाजातील जातीभेद दूर व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांपैकी काहींना समाजात कटू अनुभवही येतात, काहींना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक मदतीसोबत प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते. या योजनेसाठी ५० टक्के निधी राज्य व ५० टक्के निधी केंद्राकडून दिला जातो. दोन्ही सरकारचा निधी आल्यानंतर लाभार्थ्यांना निधी देण्यात येतो. परंतु निधी देण्यास सरकारकडून नेहमीच दिरंगाई होते. परिणामी लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होतो.मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला. परंतु केंद्राचा निधी मिळाला नसल्याने त्याचा उपयोग करता आला नाही. आता केंद्र सरकारने ९४ लाखांचा एक हप्ता दिला. त्यामुळे १ कोटी ८८ लाखांचा निधी आहे. विभागाकडून ९५० वर लाभार्थी आहेत. या निधीतून जवळपास ३७५ जोडप्यांना निधी देता येणार आहे. उर्वरित जोडप्यांना अनुदानासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :marriageलग्नGovernmentसरकार