शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
5
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
6
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
7
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
8
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
9
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
10
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
11
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
12
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

आंतरजातीय विवाह योजनेबाबत शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:38 IST

समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देदोन वर्षानंतर मिळाला निधी : कशी राबवणार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. या योजनेसाठी मिळणारा निधी तब्बल दोन वर्षानंतर केंद्र सरकारतर्फे पाठवण्यात आला तो सुद्धा कमीच. अशा परिस्थितीत आंतरजातीय विवाहाबाबत केंद्र शासन खरच गंभीर आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनुसूचित जाती, जमाती वर्गातील व्यक्तीसोबत इतर समाजाच्या व्यक्तीने लग्न केल्यास संबंधित जोडप्यास ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. समाजासमाजातील जातीभेद दूर व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांपैकी काहींना समाजात कटू अनुभवही येतात, काहींना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक मदतीसोबत प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते. या योजनेसाठी ५० टक्के निधी राज्य व ५० टक्के निधी केंद्राकडून दिला जातो. दोन्ही सरकारचा निधी आल्यानंतर लाभार्थ्यांना निधी देण्यात येतो. परंतु निधी देण्यास सरकारकडून नेहमीच दिरंगाई होते. परिणामी लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होतो.मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला. परंतु केंद्राचा निधी मिळाला नसल्याने त्याचा उपयोग करता आला नाही. आता केंद्र सरकारने ९४ लाखांचा एक हप्ता दिला. त्यामुळे १ कोटी ८८ लाखांचा निधी आहे. विभागाकडून ९५० वर लाभार्थी आहेत. या निधीतून जवळपास ३७५ जोडप्यांना निधी देता येणार आहे. उर्वरित जोडप्यांना अनुदानासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :marriageलग्नGovernmentसरकार