शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल शासनाने लपविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 21:49 IST

Nagpur news लेटरबॉम्ब प्रकरणात शरद पवार यांनी निवृत्त महासंचालक ज्यूलिओ रिबेरो यांची चौकशी लावावी असे म्हटले आहे. रिबेरो हे अतिशय चांगले आणि हुशार अधिकारी आहेत. मात्र अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले महासंचालक रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी करू शकतील का, असा सवाल फडणवीसांनी केला.

ठळक मुद्देगृहमंत्र्यांचा अगोदर राजीनामा घ्या, मगच चौकशी लावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या ‘लेटरबॉम्ब’मुळे राजकारण चांगलेच तापले आहे. केवळ सिंह यांनीच सरकारला पत्र लिहिलेले नाही. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीदेखील सरकारकडे खळबळजनक अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलीस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले होते. मात्र तो स्फोटक अहवाल शासनाने लपविला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

तत्कालीन आयुक्त, गुप्तवार्ता रश्मी शुक्ला यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशांच्या अधीन राहून काही फोन पोलिसांकडून ‘सर्व्हेलन्स’वर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले, ते फारच स्फोटक आहेत. मात्र त्यावर काहीच पावले उचलण्यात आली नाहीत. उलट, रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, त्यांना तेथेच पदस्थापना देण्यात आली. भ्रष्टाचारविरोधात कारवाई करण्याबाबत शासन अजिबात गंभीर नव्हते. त्यामुळे एकेक करीत वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेले, असा दावा फडणवीस यांनी केला. लेटरबॉम्ब प्रकरणात शरद पवार यांनी निवृत्त महासंचालक ज्यूलिओ रिबेरो यांची चौकशी लावावी असे म्हटले आहे. रिबेरो हे अतिशय चांगले आणि हुशार अधिकारी आहेत. मात्र अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले महासंचालक रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी करू शकतील का, असा सवाल फडणवीसांनी केला. गृहमंत्र्यांचा राजीनामा अगोदर घ्यावा व त्यानंतर न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी लावावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना नियमांची माहिती नाही का ?

परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने सचिन वाझे यांना नोकरीत घेतले, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत असले तरी, मुख्यमंत्र्यांच्या तसेच गृहमंत्र्यांच्या निर्देशांनंतरच त्यांनी हे काम केले, हे सांगायला मात्र पवार विसरले. मुळात निलंबित अधिकाऱ्याला परत घेताना ‘एक्झिक्युटिव्ह’ पद देता येत नाही. या नियमाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कल्पना नव्हती का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

गृहखाते चालविते तरी कोण ?

शरद पवार हे या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे ते सरकारची बाजू लावून धरणारच. मात्र गृहखाते अनिल देशमुख चालवितात की शिवसेनेचे अनिल परब हा प्रश्न निर्माण झाला आहे. सभागृहात गृहविभागाच्या मुद्द्यांवर परबच बोलताना दिसतात. त्यामुळे नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप कुणाचा हे स्पष्ट झाले पाहिजे, असे प्रतिपादनही फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस