शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या भांडणात शासकीय समित्या संक्रमित; कार्यकर्त्यांत खदखद वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 08:26 IST

Nagpur News प्रत्यक्षात मंत्र्यांच्या अंतर्गत भांडणांमुळे शासकीय समित्याच संक्रमित झाल्या आहेत. नेत्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे निष्ठेने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे मात्र नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे पावणेदोन वर्षे होऊनही नियुक्त्या नाहीत 

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पक्षासाठी, नेत्यांसाठी दिवसरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध शासकीय समित्यांवर नियुक्ती देऊन नेत्यांनी न्याय द्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. मात्र, राज्य सरकारला पावणेदोन वर्षे होत आली असताना तालुका व जिल्हास्तरीय बहुतांश शासकीय समित्यांवर नियुक्त्या झालेल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर सुमारे ५ हजार कार्यकर्ते विशेष कार्यकारी अधिकारीपदी (एसईओ) नियुक्तीसाठी वेटिंगवर आहेत. या विलंबासाठी नेते लॉकडाऊनचे कारण समोर करीत असले तरी प्रत्यक्षात मंत्र्यांच्या अंतर्गत भांडणांमुळे शासकीय समित्याच संक्रमित झाल्या आहेत. नेत्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे निष्ठेने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे मात्र नुकसान होत आहे.

प्रशासकीय पातळीवर शासकीय कामकाज अधिक गतीने व्हावे यासाठी तालुका व जिल्हास्तरावर विविध शासकीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांवर सत्ताधारी नेते आपल्या मर्जीतील व त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती, कार्यकर्त्याला नियुक्ती देतात. तालुकास्तरावर संजय गांधी निराधार समिती, समन्वय समिती, वीज समिती, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण समिती, आरोग्य समिती, रोजगार हमी समिती, पांदण रस्ते समिती, अशा विविध समित्या आहेत. यापैकी संजय गांधी निराधार व पांदण रस्ते समिती वगळता उर्वरित सर्वच समित्या जिल्हास्तरावरदेखील आहेत. या समित्यांवरील नियुक्ती करताना पालकमंत्री आपल्या, तसेच मित्र पक्षातील मंत्री व आमदारांच्या शिफारसी विचारात घेतात. जेथे आपला आमदार नसेल तेथे पक्षाकडून लढलेल्या उमेदवाराच्या शिफारशींचा विचार केला जातो. मात्र, अंतिम अधिकार पालकमंत्र्यांचा असतो. नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत व युवक कल्याण व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यातील मतभेदांमुळे एखाद अपवाद वगळता बहुतांश शासकीय समितीवर नियुक्त्या झालेल्या नाहीत. प्राप्त माहितीनुसार या समित्यांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची नावे पाठविण्यात आली. याद्याही तयार झाल्या; पण ‘हे नाव काप, ते नाव टाक’च्या रस्सीखेचामुळे याद्याच मंजूर झालेल्या नाहीत. यामुळे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याच भरवशावर या समित्यांच्या प्रशासकीय कामकाजाचा गाडा ओढला जात आहे.

‘विशेष कार्यकारी अधिकारी’साठी ५ हजारांवर कार्यकर्ते वेटिंगवर

- एक हजार लोकसंख्येमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमता येतो. नागपूर शहर व जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या सुमारे ५० लाखावर आहे. यानुसार जवळपास ५ हजार कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करून न्याय देता येऊ शकतो. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून पहिल्या सहा महिन्यांतच सुमारे ४ हजार कार्यकर्त्यांच्या नियुक्तीला राज्य सरकारची मंजुरी मिळविली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र मंत्र्यांमध्येच समन्वय दिसत नाही. त्यामुळे अद्याप एकही नियुक्ती झालेली नाही.

राऊत-केदार शीतयुद्ध सुरू

- नागपूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत व युवक कल्याण व क्रीडामंत्री सुनील केदार, असे दोन मंत्री आहेत. दोन्ही काँग्रेसचेच आहेत. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना परमवीरसिंग प्रकरणामुळे गृहमंत्रीपद गमवावे लागले. या नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद टोकाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत राऊत- देशमुख विरुद्ध केदार, असा थेट सामना रंगताना दिसला. आता राऊत- केदार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. पालकमंत्री म्हणून राऊत यांनी घेतलेल्या बहुतांश बैठकांना केदार उपस्थित नसतात, तर केदार यांच्या बैठकांना राऊतही फिरकत नाहीत. मंत्र्यांमधील या दुराव्यामुळे काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्तेही त्रस्त आहेत.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारNitin Rautनितीन राऊत