शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शासनाने टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केला

By admin | Updated: June 13, 2017 01:52 IST

शेतात विद्युत टॉवर उभारले असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन शासनाने टॉवरविरोधी कृती समितीशी चर्चा करताना दिले होते.

टॉवरविरोधी कृती समितीचा आरोप : शासन निर्णयाची होळीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतात विद्युत टॉवर उभारले असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन शासनाने टॉवरविरोधी कृती समितीशी चर्चा करताना दिले होते. मात्र चर्चेनंतरही ठरल्याप्रमाणे शब्द न पाळता शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला निश्चित करण्यात आला. नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयात ६६० केव्ही ते १२०० केव्हीपर्यंतच्या कामांना हा निर्णय लागू नाही. त्यामुळे शासनाने टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी पत्रपरिषदेत केला.मिलिंद पाटील यांनी सांगितले, राज्यभरात शेतकऱ्यांच्या जमिनीवर दोन ते अडीच लाख टॉवर उभारण्यात आले असून, सात लाखांच्यावर शेतकरी प्रभावित आहेत. गेल्या दोन वर्षांत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० बैठका घेतल्या. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. ऊर्जामंत्र्यांनी सर्व अधिकारी व ऊर्जा सचिव यांच्याशी बैठका घेऊन टॉवरखाली जितकी जमीन येते त्याच्या दुप्पट जमीन नुकसानीचे क्षेत्र ग्राह्य धरले आहे. जमिनीच्या रेडिरेकनरचा जो दर आहे त्याच्या चारपट दर निश्चित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी कृती समितीची भूमिका होती. फळबागांचा मोबदला देताना झाडाचे आयुष्य, त्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न आणि ३० वर्षांआधी झाड तोडत असल्याने द्यावा लागणारा मोबादला याचा एकत्रित विचार होणे आवश्यक होते. मात्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणारा वन टाइम मोबदला फारच अत्यल्प राहणार आहे. एकूणच या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीत सरकारने खंजीरच खुपसला आहे. शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. जमिनीच्या रेडिरेकनरचा दर चारपट धरावा व त्या पद्धतीने नुकसानभरपाई द्यावी, विद्युत तारेखाली येणाऱ्या जमिनीचे मोजमाप करताना तिच्या लांबी-रुंदीसह कॉरिडोरचे मोजमाप करावे, आदी मागण्याही त्यांनी केल्या. पत्रपरिषदेत दिनेश पाथरे, श्रीकांत आढाऊ, अनिल नागरे उपस्थित होते.१५ ला धरणे व निर्णयाची होळीसरकारच्या धोरणाविरोधात १५ जूनला दुपारी १ वाजता राज्यभर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीतर्फे धरणे देण्यात येणार आहे. २० जूनला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून टॉवरग्रस्त शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असेही मिलिंद पाटील यांनी सांगितले.