शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शासनाने टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केला

By admin | Updated: June 13, 2017 01:52 IST

शेतात विद्युत टॉवर उभारले असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन शासनाने टॉवरविरोधी कृती समितीशी चर्चा करताना दिले होते.

टॉवरविरोधी कृती समितीचा आरोप : शासन निर्णयाची होळीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतात विद्युत टॉवर उभारले असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन शासनाने टॉवरविरोधी कृती समितीशी चर्चा करताना दिले होते. मात्र चर्चेनंतरही ठरल्याप्रमाणे शब्द न पाळता शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला निश्चित करण्यात आला. नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयात ६६० केव्ही ते १२०० केव्हीपर्यंतच्या कामांना हा निर्णय लागू नाही. त्यामुळे शासनाने टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी पत्रपरिषदेत केला.मिलिंद पाटील यांनी सांगितले, राज्यभरात शेतकऱ्यांच्या जमिनीवर दोन ते अडीच लाख टॉवर उभारण्यात आले असून, सात लाखांच्यावर शेतकरी प्रभावित आहेत. गेल्या दोन वर्षांत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० बैठका घेतल्या. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही. ऊर्जामंत्र्यांनी सर्व अधिकारी व ऊर्जा सचिव यांच्याशी बैठका घेऊन टॉवरखाली जितकी जमीन येते त्याच्या दुप्पट जमीन नुकसानीचे क्षेत्र ग्राह्य धरले आहे. जमिनीच्या रेडिरेकनरचा जो दर आहे त्याच्या चारपट दर निश्चित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी कृती समितीची भूमिका होती. फळबागांचा मोबदला देताना झाडाचे आयुष्य, त्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न आणि ३० वर्षांआधी झाड तोडत असल्याने द्यावा लागणारा मोबादला याचा एकत्रित विचार होणे आवश्यक होते. मात्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणारा वन टाइम मोबदला फारच अत्यल्प राहणार आहे. एकूणच या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीत सरकारने खंजीरच खुपसला आहे. शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. जमिनीच्या रेडिरेकनरचा दर चारपट धरावा व त्या पद्धतीने नुकसानभरपाई द्यावी, विद्युत तारेखाली येणाऱ्या जमिनीचे मोजमाप करताना तिच्या लांबी-रुंदीसह कॉरिडोरचे मोजमाप करावे, आदी मागण्याही त्यांनी केल्या. पत्रपरिषदेत दिनेश पाथरे, श्रीकांत आढाऊ, अनिल नागरे उपस्थित होते.१५ ला धरणे व निर्णयाची होळीसरकारच्या धोरणाविरोधात १५ जूनला दुपारी १ वाजता राज्यभर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीतर्फे धरणे देण्यात येणार आहे. २० जूनला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून टॉवरग्रस्त शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असेही मिलिंद पाटील यांनी सांगितले.