शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय :रिक्त पदांमुळे पीजीच्या सहा जागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:01 IST

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच जात नसल्याने पदव्युत्तर जागेला ग्रहण लागले आहे. महाविद्यालयाला ‘पीजी’च्या ६० जागेला मान्यता असताना रिक्त पदांमुळे ५४ जागाच भरल्या जात आहेत. दरवर्षी सहा जागांचे नुकसान होत आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयाचे चार विभाग हे ‘पीजी’विना आहेत. विदर्भातील विद्यार्थ्यांना फटका बसत असतानाही शासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देचार विभाग पीजीविनाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच जात नसल्याने पदव्युत्तर जागेला ग्रहण लागले आहे. महाविद्यालयाला ‘पीजी’च्या ६० जागेला मान्यता असताना रिक्त पदांमुळे ५४ जागाच भरल्या जात आहेत. दरवर्षी सहा जागांचे नुकसान होत आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयाचे चार विभाग हे ‘पीजी’विना आहेत. विदर्भातील विद्यार्थ्यांना फटका बसत असतानाही शासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शल्य, शालाक्य, निदान चिकित्सा, काय चिकित्सा, शारीरिक क्रिया, शरीररचना, संहितासिद्धांत, अगततंत्र, रसशास्त्र, स्वस्थवृत्त, पंचकर्म, स्त्रीरोग, द्रव्यगुण व बालरोग असे एकूण १४ विभाग आहेत. या विभागानुसार ‘पीजी’च्या २१ जागांवरून ६० करण्यात आल्या. परंतु पंचकर्म, स्त्रीरोग, द्रव्यगुण व बालरोग या चार महत्त्वाच्या विभागात प्राध्यापकांची पदे २००७ पासून भरलीच नाहीत. यामुळे पीजीच्या ६० पैकी ५४ जागाच भरल्या जात आहेत. चार विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णसेवाही प्रभावित होत आहे. एकीकडे अनेक प्राध्यापक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना शासन पदभरती करीत नसल्याने भविष्यात आणखी पीजीच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.२६० ऐवजी १८० खाटा‘भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदे’च्या निकषानुसार आयुर्वेद रुग्णालयात कमीतकमी २६० खाटा असायला हव्यात. मात्र एकाच इमारतीत रुग्णालय असल्याने खाटांची क्षमता केवळ ११० आहेत. रुग्णांची संख्या पाहता रुग्णालय प्रशासनाने ७० खाटा वाढवून १८० केल्या आहेत. नव्या पाच मजली रुग्णालयाच्या इमारतीची निर्मिती अद्यापही रखडली असल्याने वाढीव खाटाही अडचणीत आल्या आहेत.पदे भरल्यास विद्यार्थ्यांना फायदाचरिक्त पदे असल्याने निकषानुसार पीजीच्या ६० जागा भरता येत नाही. पदभरतीसंदर्भात शासनाकडे पाठपुरवा केला जात आहे. संपूर्ण पदे भरल्यास याचा फायदा रुग्णांनाही होईल व विद्यार्थ्यांनाही.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय

 

 

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरStudentविद्यार्थी