शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांची आता खैर नाही, पोलीस घालणार वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:45 IST

शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देबी.के. उपाध्याय : पोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक पोलीस हे सर्वात महत्त्वाचे घटक असतात. ते प्रभावी असणे आवश्यक असते. यासाठी जे काही शक्य असेल ते केले जाईल. शहरात काही दिवसांपासून गुंडांवरील नियंत्रणाचे काम थंड पडले आहे. मकोका आणि इतर सराईत गुन्हेगार फरार होऊन गुन्हे करीत आहेत. गोळीबारासारख्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. परंतु शहर पोलीस मूकदर्शक बनले आहे. मकोका लागल्यानंतरही गुन्हेगार सक्रिय कसे, असा प्रश्न डॉ. उपाध्याय यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांचे धोरण गुंडांना वेसण घालण्याचे आहे. गुंड काहीच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती लवकरच निर्माण झाल्याचे लोकांना दिसून येईल. कुठल्याही प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असते. गुंडांना वेसण घालण्यासाठी मकोका अतिशय परिणामकारक आहे. त्याचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांचा आश्रय असेल तर त्याच्याविरही निलंबनाची कारवाई केली जाईल. ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत असताना त्यांनी हा ‘फॉर्म्युला’ वापरला होता.गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर चर्चा करताना डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, गुन्ह्यामधील ५ ते १० टक्के लोकं सराईत गुन्हेगार असतात. तुरुंगात कार्यरत असताना कैद्यांना भेटल्यानंतर त्यांना हा अनुभव आला. गुन्ह्यांमधील इतर ९० टक्के लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव नसते. तुरुंगात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होते. त्यामुळे अशा लोकांना गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी एनजीओची मदत घेतली जाईल. त्यामुळे किमान २५ ते ३० टक्के लोकांमध्ये सुधारणा घडून येते. कॉर्पोरेट समूहही आता सामाजिक जाणिवेतून या क्षेत्रात मदत करीत आहेत. अशा लोकांशी संपर्क केला जाईल.वाहतूक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, कुठल्याही कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांचा मानवीय चेहरासुद्धा असायला हवा. नियमांचे सक्तीने पालन व्हावे, परंतु त्याचसोबत लोकांना विनाकारण त्रासही होऊ नये, याचेही पालन होणे आवश्यक आहे. पोलिसांचे काम महसूल गोळा करणे नाही. यामुळे त्यांची प्रतिमा प्रभावित होते. वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीप्रमाणे असायला हवी, असेही ते म्हणाले. डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, ते १० वर्षांनंतर नागपुरात परत आले आहेत. यादरम्यान शहरात मोठा बदल झाला आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढले आहेत. स्ट्रीट क्राईमही वाढले आहे. पोलीस आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास कायम करणे, हीच त्यांची प्राथमिकता असेल. लोकांनी पोलिसांना आपला मित्र समजायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्यामराव दिगावकर उपस्थित होते.एका हातात लाठी तर दुसऱ्यात प्रेमडॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, ते ‘एक हात मे दंडा दुजे मे है प्यार, आपको क्या चाहिए बोलो मेरे यार’ या तत्त्वावर काम करणार आहेत. सामान्य नागरिकांशी सौजन्याने तर गुन्हेगारांशी लाठीच्या भाषेतच व्यवहार केला जाईल. पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. परंतु ते नागरिकांशी कुटुंबाप्रमाणे व्यवहार करतील. येथे आठ वर्षे घालविली आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त ते अप्पर पोलीस आयुक्तापर्यंत त्यांनी या शहरात काम केले आहे. तेव्हा अनुभव आणि संबंधांचा वापर ते नागरिकांच्या सेवेसाठी करतील.रस्त्यांवर दिसून यावेत पोलीसडॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, पोलीस रस्त्यांवर दिसून यायला हवे. ते सोलापूरला असताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की, त्यांनी आठवड्यातून दोन दिवस हातात दंडा घेऊन संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण परिसरात फिरणे सुरू करावे. जनसंपर्कामुळे स्थानिक नागरिकांशी संबंध प्रस्थापित होतात. सोलापूर धार्मिक तणावासाठी चर्चेत होते. परंतु पोलिसांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कुठलाही वाद झाला नाही. लोक स्वत: फोन करून पोलिसांना सतर्क करीत होते. यामुळे स्ट्रीट क्राईमही नियंत्रणात आणता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राऊंड स्तरावरील पोलिसिंग यावर त्यांचा विश्वास आहे. नागपूरला क्राईम कॅपिटल समजण्याचे मिथक तोडले जाईल, पोलिसांना बेस्ट पोलीस सेवा दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्त