शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

By नरेश डोंगरे | Updated: August 17, 2023 22:51 IST

रेटा यशस्वी, प्रवाशांच्या मागणीला अखेर प्रतिसाद

 नागपूर : हजारो प्रवाशांच्या मागणी, तक्रारी आणि प्रवाशांसोबतच प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या रेट्याला अखेर यश आले. रेल्वे प्रशासनाने १२२८९/१२२९० सीएसएमटी मुंबई- नागपूर- मुंबई दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर- मुंबई- नागपूर मार्गावर धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीत वर्षभर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. काही महिन्यांपूर्वी या गाडीचे स्लिपर कोच कमी करून एसी कोच वाढविण्यात आले होते. २३ कोचच्या या गाडीला केवळ दाेन स्लिपर कोच असल्याने सामान्य प्रवाशांची मोठी कुचंबणा होत होती. एक तर जास्तीची रक्कम मोजून एसीत प्रवास करा किंवा दुसरी गाडी, दुसरे साधन शोधा, असा हा मुस्कटदाबीसारखा प्रकार होता. एसीत प्रवास करण्याची प्रत्येकाची आर्थिक स्थिती नसल्याने आणि स्लिपर कोच केवळ दोनच असल्याने हजारो प्रवाशांना स्लिपरचे तिकीटच मिळत नव्हते.

परिणामी, दुरांतो एक्सप्रेसमध्ये स्लिपर कोच वाढवा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागणीला प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही उचलून धरले गेले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी, रेल्वे बोर्डाकडे नियमित पत्रव्यवहारही केला जात होता. ‘लोकमत’नेही या संबंधाने वेळोवेळी प्रवाशांचा आवाज बुलंद केला होता. स्लिपर कोच वाढविण्याच्या मागणीचा रेटा प्रभावी झाल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने या गाडीचे चार एसी कोच कमी करून चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ नोव्हेंबरपासून बदल

नव्या बदलानुसार, थ्री एसीच्या १५ कोचमधून चार कोच कमी होऊन ते ११ वर येणार आहे. तर, दाेन स्लिपर कोचऐवजी आता सहा स्लिपर कोच राहणार आहे. टू एसीचे तीन कोच, वन एसीचा एक कोच आणि दाेन पॉवर कार अशी सुधारित संरचना दुरांतो एक्सप्रेसची राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरपासून होणार आहे.

...म्हणून तीन महिन्यानंतर नवा बदल!

प्रवाशांची गर्दी वाढत असताना नव्या बदलासाठी तब्बल तीन महिन्यांनंतरचा मुहूर्त का निवडला, याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, अनेक प्रवासी तीन- चार महिन्यांपूर्वीच आगावू आरक्षण करून ठेवतात. त्यांची संख्या लक्षात घेता हा बदल २२ नोव्हेंबरपासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. मानसपुरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर