शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

By नरेश डोंगरे | Updated: August 17, 2023 22:51 IST

रेटा यशस्वी, प्रवाशांच्या मागणीला अखेर प्रतिसाद

 नागपूर : हजारो प्रवाशांच्या मागणी, तक्रारी आणि प्रवाशांसोबतच प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या रेट्याला अखेर यश आले. रेल्वे प्रशासनाने १२२८९/१२२९० सीएसएमटी मुंबई- नागपूर- मुंबई दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर- मुंबई- नागपूर मार्गावर धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस या रेल्वेगाडीत वर्षभर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. काही महिन्यांपूर्वी या गाडीचे स्लिपर कोच कमी करून एसी कोच वाढविण्यात आले होते. २३ कोचच्या या गाडीला केवळ दाेन स्लिपर कोच असल्याने सामान्य प्रवाशांची मोठी कुचंबणा होत होती. एक तर जास्तीची रक्कम मोजून एसीत प्रवास करा किंवा दुसरी गाडी, दुसरे साधन शोधा, असा हा मुस्कटदाबीसारखा प्रकार होता. एसीत प्रवास करण्याची प्रत्येकाची आर्थिक स्थिती नसल्याने आणि स्लिपर कोच केवळ दोनच असल्याने हजारो प्रवाशांना स्लिपरचे तिकीटच मिळत नव्हते.

परिणामी, दुरांतो एक्सप्रेसमध्ये स्लिपर कोच वाढवा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागणीला प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही उचलून धरले गेले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी, रेल्वे बोर्डाकडे नियमित पत्रव्यवहारही केला जात होता. ‘लोकमत’नेही या संबंधाने वेळोवेळी प्रवाशांचा आवाज बुलंद केला होता. स्लिपर कोच वाढविण्याच्या मागणीचा रेटा प्रभावी झाल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने या गाडीचे चार एसी कोच कमी करून चार स्लिपर कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ नोव्हेंबरपासून बदल

नव्या बदलानुसार, थ्री एसीच्या १५ कोचमधून चार कोच कमी होऊन ते ११ वर येणार आहे. तर, दाेन स्लिपर कोचऐवजी आता सहा स्लिपर कोच राहणार आहे. टू एसीचे तीन कोच, वन एसीचा एक कोच आणि दाेन पॉवर कार अशी सुधारित संरचना दुरांतो एक्सप्रेसची राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ नोव्हेंबरपासून होणार आहे.

...म्हणून तीन महिन्यानंतर नवा बदल!

प्रवाशांची गर्दी वाढत असताना नव्या बदलासाठी तब्बल तीन महिन्यांनंतरचा मुहूर्त का निवडला, याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, अनेक प्रवासी तीन- चार महिन्यांपूर्वीच आगावू आरक्षण करून ठेवतात. त्यांची संख्या लक्षात घेता हा बदल २२ नोव्हेंबरपासून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. मानसपुरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर