शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

एसटीला चांगले दिवस येण्याची शक्यता; २० संघटना आल्या एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 13:30 IST

पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी २० संघटना एकत्र आल्या आहेत. एसटीला वाचविण्यासाठी संघटना एकत्र आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. एसटीने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून काढले. माल वाहतूक आणि खासगी गाड्यांचे टायर रिमोेडल्डिंग सुरू केले. एसटीमध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु पहिल्यांदाच एसटीला वाचविण्यासाठी २० संघटना एकत्र आल्या आहेत. एसटीला वाचविण्यासाठी संघटना एकत्र आल्यामुळे एसटीला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.कोरोनामुळे एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. माल वाहतूक सुरु केली. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी एसटीजवळ पैसा नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे असलेल्या निधीसाठी एसटीने आग्रह धरला. दोन महिने एसटीजवळ कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नव्हते. शासनाने दिल्यानंतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. महामंडळात संघटना अनेक असल्या तरी त्या आपसात भांडत असतात. परंतु पहिल्यांदा या संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांची कालच बैठक झाली. २२ पैकी १८ संघटना या बैठकीला उपस्थित होत्या. उर्वरित २ संघटनांनी या बेठकीत ठरलेल्या विषयांना अनुमती दिली. आपसातील राजकारण विसरून या संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. यामुळे एसटीला आता चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शासनात विलिनीकरण व्हावेएसटी महामंडळ हा राज्य शासनाचा उपक्रम आहे. एसटीचे कर्मचारी स्वतचा जीव धोक्यात घालून काम करतात. एसटीला तात्पुरती मदत करून भागणार नाही. त्यामुळे एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची गरज आहे.- अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना 

 

टॅग्स :state transportएसटी