शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सुनहरी यादे : बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:03 IST

जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.

ठळक मुद्देऋषिकेश रानडे, विभावरी जोशी-आपटे यांच्या स्वरांनी उजळली स्वरमैफिलसप्तकचा डॉ. विनय वाईकर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.सप्तकच्या वतीने पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात शनिवारी डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘सुनहरी यादे’ सादर झाला. नव्या दमाचे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे व विभावरी आपटे-जोशी यांनी ही गाणी सादर केली. एरवी चित्रपट गीतांचे कार्यक्रम दररोज होत असतात आणि रसिकही उत्स्फूर्त दाद देतात. मात्र, अशा मैफिलीत शब्दस्वरांची कैफियत रसिकांच्या हृदयाला भिडावी, असे क्षण क्वचितच दिसतात. गायकांची तयारी आणि रियाजातून निर्माण होणारा आर्जव अभावानेच दिसून येतो. चित्रपट गीतातील सुगम संगीतातील तो आर्जव, ते माधुर्य शनिवारी या कार्यक्रमात दिसून आले. गायकांच्या तयारीने रसिकांची मने जिंकली. एखादे गाणे आवडले म्हणजे सहजच रसिक ‘वन्स मोअर’ अशी दाद देत असतो. मात्र, एखाद्या गाण्यातील ते एखादे कडवे पुन्हा ऐकावे, अशी प्रगल्भ दाद जाणतेच देतात. अशी दाद देण्याचा सरावही अस्सल व कसलेल्या रसिक बैठकीतूनच होत असतो. अशा जाणिवेचा ‘वन्स मोअर’ शनिवारी गायकांना प्राप्त होत होता. एवढेच नव्हे तर तबल्यावर बरसणाऱ्या अंगुलीच्या तडाख्यातून व थापेतून निर्माण होणारे बोल रसिकांना ‘वन्स मोअर’चा आग्रह धरत होते, हेही जाणत्या रसिकतेचेच यश.यावेळी तुम आशा विश्वास हमारे, मैंने तेरे लिये ही, न जाने क्यों, जीवनसे भरी तेरी आंखें,याद किया दिलने, लग जा गले, भंवरेकी गुंजन, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, लाजून हासणे, धुंदी कळ्यांना, कल्पवृक्ष कन्येसाठी, बगळ्यांची माळ फुले, माझे मन तुझे झाले, जे वेड मजला लागले, मी डोलकर, मैं दिल हुँ एक अरमान भरा, अगर तो है तुमसे, आपके हसीन रूख पे, छुपालो युँ दिल में प्यार मेरा, रहें ना रहें हम, फुलो के रंग से, हमारे बाद अब महफिल में, एक प्यार का नगमा है... अशी गाणी सादर झाली. गायकांना कीबोर्डवर केदार परांजपे, दर्शना जोग, तबल्यावर विक्रम भट, ढोलकी व साईड रिदमवर विलास अंडुलकर यांनी साथसंगत केली. तत्पूर्वी गायक व वादकांचे स्वागत डॉ. वीणा वाईकर, अपर्णा वाईकर, डॉ. मनिषा पटवर्धन, डॉ. पल्लवी सिन्हा, समीर बेंद्रे यांनी केले. प्रास्ताविक अमित वाईकर यांनी केले तर संचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक डॉ. सुधीर भावे व रेणुका देशकर यांच्या संवादातून प्रत्येक गीताचा इतिहास रसिकांसमोर येत होता.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर