शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सुनहरी यादे : बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:03 IST

जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.

ठळक मुद्देऋषिकेश रानडे, विभावरी जोशी-आपटे यांच्या स्वरांनी उजळली स्वरमैफिलसप्तकचा डॉ. विनय वाईकर स्मृती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर्त भावना दाटून येते.सप्तकच्या वतीने पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात शनिवारी डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम ‘सुनहरी यादे’ सादर झाला. नव्या दमाचे प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे व विभावरी आपटे-जोशी यांनी ही गाणी सादर केली. एरवी चित्रपट गीतांचे कार्यक्रम दररोज होत असतात आणि रसिकही उत्स्फूर्त दाद देतात. मात्र, अशा मैफिलीत शब्दस्वरांची कैफियत रसिकांच्या हृदयाला भिडावी, असे क्षण क्वचितच दिसतात. गायकांची तयारी आणि रियाजातून निर्माण होणारा आर्जव अभावानेच दिसून येतो. चित्रपट गीतातील सुगम संगीतातील तो आर्जव, ते माधुर्य शनिवारी या कार्यक्रमात दिसून आले. गायकांच्या तयारीने रसिकांची मने जिंकली. एखादे गाणे आवडले म्हणजे सहजच रसिक ‘वन्स मोअर’ अशी दाद देत असतो. मात्र, एखाद्या गाण्यातील ते एखादे कडवे पुन्हा ऐकावे, अशी प्रगल्भ दाद जाणतेच देतात. अशी दाद देण्याचा सरावही अस्सल व कसलेल्या रसिक बैठकीतूनच होत असतो. अशा जाणिवेचा ‘वन्स मोअर’ शनिवारी गायकांना प्राप्त होत होता. एवढेच नव्हे तर तबल्यावर बरसणाऱ्या अंगुलीच्या तडाख्यातून व थापेतून निर्माण होणारे बोल रसिकांना ‘वन्स मोअर’चा आग्रह धरत होते, हेही जाणत्या रसिकतेचेच यश.यावेळी तुम आशा विश्वास हमारे, मैंने तेरे लिये ही, न जाने क्यों, जीवनसे भरी तेरी आंखें,याद किया दिलने, लग जा गले, भंवरेकी गुंजन, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, लाजून हासणे, धुंदी कळ्यांना, कल्पवृक्ष कन्येसाठी, बगळ्यांची माळ फुले, माझे मन तुझे झाले, जे वेड मजला लागले, मी डोलकर, मैं दिल हुँ एक अरमान भरा, अगर तो है तुमसे, आपके हसीन रूख पे, छुपालो युँ दिल में प्यार मेरा, रहें ना रहें हम, फुलो के रंग से, हमारे बाद अब महफिल में, एक प्यार का नगमा है... अशी गाणी सादर झाली. गायकांना कीबोर्डवर केदार परांजपे, दर्शना जोग, तबल्यावर विक्रम भट, ढोलकी व साईड रिदमवर विलास अंडुलकर यांनी साथसंगत केली. तत्पूर्वी गायक व वादकांचे स्वागत डॉ. वीणा वाईकर, अपर्णा वाईकर, डॉ. मनिषा पटवर्धन, डॉ. पल्लवी सिन्हा, समीर बेंद्रे यांनी केले. प्रास्ताविक अमित वाईकर यांनी केले तर संचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक डॉ. सुधीर भावे व रेणुका देशकर यांच्या संवादातून प्रत्येक गीताचा इतिहास रसिकांसमोर येत होता.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर