शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 20:56 IST

आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देआर.आर. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आर.आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी धम्माचा प्रचार, आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्यासाठी जीवाचे रान केले, खस्ता खाल्ल्या. त्यांचे कार्य व्यर्थ जाणार नाही. आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रघुनाथराव ऊर्फ आर. आर. पाटील यांच्या २६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात त्यांच्या तैलचित्राचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. राजेंद्र पाटील, हरिदास टेंभुर्णे, स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे तसेच आर. आर. यांचा मुलगा वसंतराव पाटील, स्नुषा हेमलता पाटील आणि मुलगी नलिनीताई पुडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, माणसे स्वत:साठी जगतात पण काही लोक स्वत:सोबत इतरांच्या, समाजाच्या भल्यासाठी जगतात. आर. आर. पाटील हेही समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार रुजविण्यासाठी अनमोल असे कार्य केले. केवळ स्वत: नाही तर संपूर्ण कुटुंब त्यांनी या कार्यासाठी वाहून घेतले. त्याग आणि बलिदानाशिवाय काहीच मिळत नाही. बाबासाहेबांच्या त्यागामुळे कोट्यवधी समाजाला सन्मानाचे जीवन मिळाले. त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन पाटील यांनीही स्वत:ला चळवळीत झोकून दिले आणि त्यासाठी मृत्यूपर्यंत कार्य केले. ते खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे सेनापती होते, असे गौरवोद््गार प्रा. कवाडे यांनी काढले.अ‍ॅड. राजेंद्र पाटील आणि हरिदास टेंभुर्णे यांनीही पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एम्प्रेस मिलमध्ये नोकरी मिळाल्यापासून भानखेड्यात वास्तव्य असताना आंबेडकरी चळवळीशी जुळलेला त्यांचा संबंध, स्वतंत्र मजूर पक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख म्हणून केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी आणि पुढे दीक्षाभूमी व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत असलेल्या त्यांच्या योगदानाचाही उलगडा या ज्येष्ठ विचारवंतांनी केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश बहादुरे यांनी केला तर वसंतराव पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी