शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रिपब्लिकन पक्षाला सुवर्ण दिवस येतील : जोगेंद्र कवाडे यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 20:56 IST

आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देआर.आर. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आर.आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी धम्माचा प्रचार, आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्यासाठी जीवाचे रान केले, खस्ता खाल्ल्या. त्यांचे कार्य व्यर्थ जाणार नाही. आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला.प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रघुनाथराव ऊर्फ आर. आर. पाटील यांच्या २६ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात त्यांच्या तैलचित्राचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. यावेळी प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. राजेंद्र पाटील, हरिदास टेंभुर्णे, स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, विलास गजघाटे तसेच आर. आर. यांचा मुलगा वसंतराव पाटील, स्नुषा हेमलता पाटील आणि मुलगी नलिनीताई पुडके प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. कवाडे पुढे म्हणाले, माणसे स्वत:साठी जगतात पण काही लोक स्वत:सोबत इतरांच्या, समाजाच्या भल्यासाठी जगतात. आर. आर. पाटील हेही समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार रुजविण्यासाठी अनमोल असे कार्य केले. केवळ स्वत: नाही तर संपूर्ण कुटुंब त्यांनी या कार्यासाठी वाहून घेतले. त्याग आणि बलिदानाशिवाय काहीच मिळत नाही. बाबासाहेबांच्या त्यागामुळे कोट्यवधी समाजाला सन्मानाचे जीवन मिळाले. त्यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन पाटील यांनीही स्वत:ला चळवळीत झोकून दिले आणि त्यासाठी मृत्यूपर्यंत कार्य केले. ते खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे सेनापती होते, असे गौरवोद््गार प्रा. कवाडे यांनी काढले.अ‍ॅड. राजेंद्र पाटील आणि हरिदास टेंभुर्णे यांनीही पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एम्प्रेस मिलमध्ये नोकरी मिळाल्यापासून भानखेड्यात वास्तव्य असताना आंबेडकरी चळवळीशी जुळलेला त्यांचा संबंध, स्वतंत्र मजूर पक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख म्हणून केलेले कार्य आणि डॉ. बाबासाहेब यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी आणि पुढे दीक्षाभूमी व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत असलेल्या त्यांच्या योगदानाचाही उलगडा या ज्येष्ठ विचारवंतांनी केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश बहादुरे यांनी केला तर वसंतराव पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी