शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

ईश्वरही आता राजकारणातला कार्यकर्ता झालाय! सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले

ठळक मुद्देराजकारण नुसते भ्रष्टच नाही तर दुष्टही झाले आहेदहादिवसीय युगांतर व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले आणि आता ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न पडत असल्याची राजकीय कोटी करत ज्येष्ठ साहित्यिक व लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी राजकारणाचे विश्लेषण केले. राजकारणात धर्म आल्यापासून ईश्वरही राजकारणातला कार्यकर्ता झाला असावा, असा पक्का समज झाल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशिवार यांच्या दहादिवसीय युगांतर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी त्यांनी ‘राजकारण’ या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफले.महात्मा गांधी आणि कौटिल्याने राजकारणावर केलेल्या व्याख्या सांगतानाच, त्यावरील विश्लेषण द्वादशीवार यांनी यावेळी केले. महात्मा गांधी यांनी ईश्वराच्या उपासनेचा प्रमुख मार्ग म्हणून राजकारणाचा मार्ग निवडला होता. तर, कौटिल्याने राजनिती व लोकनिती असे दोन विभाग करत राजसत्तेसाठी राजकारण असल्याचे सांगितले होते. राजकारणात सत्तास्थापित करताना अबाधित ठेवण्यासाठी व विस्तारित करण्यासाठी जो आडवा येईल, त्याला ठेचण्याचा उपदेश केला. या दोन मार्गापैकी वर्तमानातील राजनेते कौटिल्याचीच उपासना करत असल्याची टिका द्वादशिवार यांनी यावेळी केली. नेहरूंपर्यंत राजकारण महात्मा गाधी यांच्या अध्यात्मावर चालत होते. नंतर मात्र सत्तेचे सामूहिक राजकारणात रूपांतरण झाले. वर्तमानात पुन्हा एकदा सत्ता एकहाती आली तरी त्यांचे केंद्र स्वार्थात असल्याचे ते म्हणाले. राजकारणाचे एक एक पैलू उलगडताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रहारही केले. एकेकाळी रस्त्यावर असलेला नेता नंतर शेकडो-हजारो कोटींचा मालक होतो.कोणताही उद्योग-व्यवसाय नसताना हे कसे शक्य होते? ७८ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असलेला नेता एका रात्रीत पक्षांतर करताच शुद्ध होतो, त्याला उपमुख्यमंत्रीही बनविले जाते आणि तो पुन्हा माहेरी परतल्यावर त्याच्या घोटाळ्याचे पुनरूज्जीविकरण कसे करायचे, यावर चर्चा सुरू होते. कोणता खासदार कोणाच्या पे रोलवर संसदेत पोहोचतो, गोरदेजला २६ हजार कोटीचे कंत्राट दिले नाही म्हणून मुख्यमंत्र्यावर दिल्ली राग का करते, क्रिकेट बोर्डावर राजकीय नेते शरद पवार, लालू प्रसाद यादव कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित करत प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी राजकारणाचे अनेक चांगले व मलिन पैलू उपस्थितांसमोर उलगडले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. स्वागत श्रीराम काळे यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर