शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
3
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
4
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
5
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
6
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
7
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
8
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
9
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
10
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
11
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
12
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
13
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
14
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
15
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
16
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
17
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
18
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
19
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
20
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद

जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:19 IST

२००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते. सद्यस्थितीत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यांची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहे. पुढील दोन वर्षात जर्मनी तर पाच वर्षांत जपानला भारत सहज मागे टाकेल, असे डॉ.ए.एम.गोंडाणे म्हणाले. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पं.जवाहरलाल नेहरू यांनी रचला. त्यानंतर वेळोवेळी परराष्ट्र धोरणात बदल होत गेला. देशातील स्थानिक परिस्थितींनुसार परराष्ट्र धोरण ठरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थितीनुसार परराष्ट्र धोरणाची आखणी होते. सोबतच देशाच्या आवश्यकतेनुसार परराष्ट्र धोरणाची भूमिका घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.दूतावासात काम करत असताना राजदूतांना दोन देशांमधील राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे यावर भर द्यावा लागतो. एखादा वाद असेल तर तोदेखील सामंजस्यानेच सोडविण्याची भूमिका असते. आजच्या घडीला जगातील विविध देशांमध्ये भारतीय मूळाचे तीन कोटींहून अधिक लोक राहत आहेत. अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. हे भारतीय नागरिक देशाची खरी ताकद बनू शकतात, असे ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनीदेखील यावेळी आपले मनोगत मांडले. तर डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर