शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:19 IST

२००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या तीन देशांमध्ये गणली जाईल, असे मत आॅस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाचे उच्चायुक्त डॉ.ए.एम.गोंडाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी ‘भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारतीय परराष्ट्र सेवा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते. सद्यस्थितीत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यांची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहे. पुढील दोन वर्षात जर्मनी तर पाच वर्षांत जपानला भारत सहज मागे टाकेल, असे डॉ.ए.एम.गोंडाणे म्हणाले. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया पं.जवाहरलाल नेहरू यांनी रचला. त्यानंतर वेळोवेळी परराष्ट्र धोरणात बदल होत गेला. देशातील स्थानिक परिस्थितींनुसार परराष्ट्र धोरण ठरत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थितीनुसार परराष्ट्र धोरणाची आखणी होते. सोबतच देशाच्या आवश्यकतेनुसार परराष्ट्र धोरणाची भूमिका घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले.दूतावासात काम करत असताना राजदूतांना दोन देशांमधील राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे यावर भर द्यावा लागतो. एखादा वाद असेल तर तोदेखील सामंजस्यानेच सोडविण्याची भूमिका असते. आजच्या घडीला जगातील विविध देशांमध्ये भारतीय मूळाचे तीन कोटींहून अधिक लोक राहत आहेत. अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. हे भारतीय नागरिक देशाची खरी ताकद बनू शकतात, असे ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनीदेखील यावेळी आपले मनोगत मांडले. तर डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर