शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

विड्याच्या पानाला पिकाचा दर्जा द्या, विम्याचे संरक्षण द्या!

By योगेश पांडे | Updated: December 12, 2023 18:23 IST

विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली.

नागपूर : विदर्भात विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे व हजारो शेतकरी या पानांचे उत्पादन करतात. अवकाळी पावसाचा संबंधित शेतकऱ्यांनादेखील फटका बसतो. मात्र याला कृषी पीक म्हणून मान्यताच नसल्याने विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विड्याचे पान व पानपिंपरी या पिकांना कृषी पिकाचा दर्जा देत विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली. नियम ९७ अन्वये अवकाळी पावसावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते बोलत होते.

विड्याचे पान खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप आहे. पानपिंपरीतून आयुर्वेदिक औषधे तयार होता. हजारो शेतकरी याचे उत्पादन घेतात. मात्र ते हवालदील झाले आहेत, याकडे दटके यांनी लक्ष वेधले. पीक विमा कंपन्यांकडून नागपुरातील काही शेतकऱ्यांना १२, ५२, ५६ रुपयांची रक्कम देण्यात आली. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष घालावे, कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करू नये अशी मागणी त्यांनी केली.

- मिटकरींची मागणी, अधिवेशन वाढवाअमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिेवशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील मुद्द्यांवर व्हावे यासाठी भरवले जाते. मात्र विदर्भाच्या मुद्द्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, असे ते म्हणाले.

- पीक विमे कंपन्यांचे फायद्यासाठी?पीक विमे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी असतात. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे पिक विमा हे कंपनीचे फायद्यासाठी असतात का? असा सवाल यांनी अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी प्रज्ञा सातव यांनी सुद्धा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर