शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

मुस्लिमांना आरक्षण द्या!

By admin | Updated: March 1, 2015 02:24 IST

सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, ...

नागपूर : सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन (एमआयएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज येथे जाहीरपणे केली. गेल्या ६५ वर्षात मुस्लीम समाजावर सातत्याने अन्याय करण्यात आला. याविरोधात आवाज उचलला असता त्यांच्यावर कठोर बोलत असल्याचा आरोप केला जातो. परंतु जोपर्यंत मुस्लिमांवरील अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत त्यांना बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम नागपूर शाखेतर्फे आसीनगर झोन कार्यालय समोरील बुद्धा पार्क मैदानात आयोजित पहिल्याच जाहीर सभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ओवैसी यांना नोटीस खा. असदुद्दीन ओवैसी हे आपल्या नियोजित सभेसाठी नागपुरात पोहोचताच त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. ओवैसी रविभवन येथे पोहोचताच पोलीस निरीक्षक आर.डी. निकम यांनी त्यांना नोटीस दिली. कलम १४४ अंतर्गत बजावण्यात आलेल्या या नोटीसमध्ये ओवैसी यांना वादग्रस्त भाषण न करण्याची ताकीद देण्यात आली. यानंतर सभेमध्ये आपल्या भाषणात ओवैसी या नोटीससंदर्भात चिमटा काढीत म्हणाले की, त्यांना नोटीस न मिळाल्याने खाज सुटते. अशा कितीही नोटीस मिळाल्या तरी मुस्लिमांवरील अन्यायाचा मुद्दा मांडण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. पत्रकारांवर दगडफेक सभेदरम्यान काही तरुणांनीपत्रकारांवर दगडफेक केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना संयम ठेवण्याची विनंती केली. ओवैसी यांचे भाषण सुरू असताना एकाने जोशात येऊन शिवी दिली. ओवैसी यांनी यावर आक्षेप घेतआपल्याला लोकशाही पद्धतीने लढा द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सामाजिक सद्भाव व शांती ही सर्वोपरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनाही केले लक्ष्य ओवैसी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, खरच पंतप्रधानांना ‘सबका साथ सबका विकास’ हवा आहे, तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आदेश द्यावे. पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे परस्परविरोधी असते. तेव्हा कोण खरं बोलत आहे, हेच कळत नाही.