शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना आरक्षण द्या!

By admin | Updated: March 1, 2015 02:24 IST

सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, ...

नागपूर : सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे दाखले सादर करीत महाराष्ट्रातील मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन (एमआयएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज येथे जाहीरपणे केली. गेल्या ६५ वर्षात मुस्लीम समाजावर सातत्याने अन्याय करण्यात आला. याविरोधात आवाज उचलला असता त्यांच्यावर कठोर बोलत असल्याचा आरोप केला जातो. परंतु जोपर्यंत मुस्लिमांवरील अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत त्यांना बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएम नागपूर शाखेतर्फे आसीनगर झोन कार्यालय समोरील बुद्धा पार्क मैदानात आयोजित पहिल्याच जाहीर सभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ओवैसी यांना नोटीस खा. असदुद्दीन ओवैसी हे आपल्या नियोजित सभेसाठी नागपुरात पोहोचताच त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. ओवैसी रविभवन येथे पोहोचताच पोलीस निरीक्षक आर.डी. निकम यांनी त्यांना नोटीस दिली. कलम १४४ अंतर्गत बजावण्यात आलेल्या या नोटीसमध्ये ओवैसी यांना वादग्रस्त भाषण न करण्याची ताकीद देण्यात आली. यानंतर सभेमध्ये आपल्या भाषणात ओवैसी या नोटीससंदर्भात चिमटा काढीत म्हणाले की, त्यांना नोटीस न मिळाल्याने खाज सुटते. अशा कितीही नोटीस मिळाल्या तरी मुस्लिमांवरील अन्यायाचा मुद्दा मांडण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. पत्रकारांवर दगडफेक सभेदरम्यान काही तरुणांनीपत्रकारांवर दगडफेक केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना संयम ठेवण्याची विनंती केली. ओवैसी यांचे भाषण सुरू असताना एकाने जोशात येऊन शिवी दिली. ओवैसी यांनी यावर आक्षेप घेतआपल्याला लोकशाही पद्धतीने लढा द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सामाजिक सद्भाव व शांती ही सर्वोपरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनाही केले लक्ष्य ओवैसी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, खरच पंतप्रधानांना ‘सबका साथ सबका विकास’ हवा आहे, तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आदेश द्यावे. पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे परस्परविरोधी असते. तेव्हा कोण खरं बोलत आहे, हेच कळत नाही.