शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पिवळ्या नदीत वाहून गेली बालिका : पुलावरून पडली नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:49 IST

Girl Drown in river, Nagpur News वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून एक ११ वर्षांची बालिका पिवळी नदीत वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. नदीत वाहून गेलेल्या बालिकेचा अद्याप शोध लागला नाही. प्रशासनाने बालिकेचा शोध सुरु केला आहे.

ठळक मुद्देबहिणीसोबत माजरीवरून परतताना झाली दुर्घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून एक ११ वर्षांची बालिका पिवळी नदीत वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. नदीत वाहून गेलेल्या बालिकेचा अद्याप शोध लागला नाही. प्रशासनाने बालिकेचा शोध सुरु केला आहे. यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून शोध मोहीम सुरु केली आहे.

सालेहा मुस्कान सलीम अन्सारी (११) असे वाहून गेलेल्या बालिकेचे नाव आहे. पिवळी नदी येथील संगमनगरच्या गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी मुस्कान आपली मोठी बहीण आलिया सोबत आपली आई शफिकउन्नीसा यांना भेटण्यासाठी गेली होती. आईकडून पैसे मिळाल्यामुळे दोघी बहिणी खूश होत्या. त्या वनदेवीनगर मुख्य पुलाला लागून असलेल्या लोखंडी पुलावरून घरी परत येत होत्या. सालेहा आपल्या मोठ्या बहिणीच्या मागे चालत होती. दरम्यान चालताना अचानक सालेहाचे संतुलन बिघडले. ती पिवळी नदीत पडली. सालेहा नदीत पडल्याचा आवाज आल्यामुळे आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले. दरम्यान दोघा जणांनी सालेहाला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे त्यांना तिचा शोध लागला नाही. वनदेवीनगर मुख्य पुलाचे काम सुरु असल्यामुळे पाणी अडविण्यात येते. परंतु बुधवारी पाणी थांबविण्याचे साधन हटविण्यात आले. त्यामुळे नदीला अधिक प्रवाह होता. बालिकेचे वडील सलीम अहमद अन्सारी भाजी विक्रेता आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पुलाची अवस्था आहे बिकट

पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने बालिकेचा शोध सुरु आहे. बालिका मिळाल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे. अस्थायी पुलाची अवस्था चांगली नाही. त्यामुळेच बालिका नदीत पडली.

रमाकांत दुर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यशोधरानगर

जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात नागरिक

वांजरा, माजरी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मागील दोन वर्षांपासून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. येथे तयार करण्यात आलेला अस्थायी पुल जीवघेणा ठरत आहे. ज्या पुलावरून बालिका नदीत पडली त्या पुलाच्या दोन्ही बाजुला केवळ सिंगल पाईप लावलेले आहेत. त्यामुळे संतुलन बिघडून नदीत पडण्याचा धोका असतो. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाच्या महामार्ग निधीतून पिवळी नदीच्या वनदेवीनगर पुलाचे काम सुरु आहे. प्रशासनाने जून २०२० मध्ये हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या पुलाचे काम अपूर्ण आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू