शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिवळ्या नदीत वाहून गेली बालिका : पुलावरून पडली नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:49 IST

Girl Drown in river, Nagpur News वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून एक ११ वर्षांची बालिका पिवळी नदीत वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. नदीत वाहून गेलेल्या बालिकेचा अद्याप शोध लागला नाही. प्रशासनाने बालिकेचा शोध सुरु केला आहे.

ठळक मुद्देबहिणीसोबत माजरीवरून परतताना झाली दुर्घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : वनदेवीनगरच्या अस्थायी पुलावरून पडून एक ११ वर्षांची बालिका पिवळी नदीत वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. नदीत वाहून गेलेल्या बालिकेचा अद्याप शोध लागला नाही. प्रशासनाने बालिकेचा शोध सुरु केला आहे. यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून शोध मोहीम सुरु केली आहे.

सालेहा मुस्कान सलीम अन्सारी (११) असे वाहून गेलेल्या बालिकेचे नाव आहे. पिवळी नदी येथील संगमनगरच्या गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी मुस्कान आपली मोठी बहीण आलिया सोबत आपली आई शफिकउन्नीसा यांना भेटण्यासाठी गेली होती. आईकडून पैसे मिळाल्यामुळे दोघी बहिणी खूश होत्या. त्या वनदेवीनगर मुख्य पुलाला लागून असलेल्या लोखंडी पुलावरून घरी परत येत होत्या. सालेहा आपल्या मोठ्या बहिणीच्या मागे चालत होती. दरम्यान चालताना अचानक सालेहाचे संतुलन बिघडले. ती पिवळी नदीत पडली. सालेहा नदीत पडल्याचा आवाज आल्यामुळे आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले. दरम्यान दोघा जणांनी सालेहाला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे त्यांना तिचा शोध लागला नाही. वनदेवीनगर मुख्य पुलाचे काम सुरु असल्यामुळे पाणी अडविण्यात येते. परंतु बुधवारी पाणी थांबविण्याचे साधन हटविण्यात आले. त्यामुळे नदीला अधिक प्रवाह होता. बालिकेचे वडील सलीम अहमद अन्सारी भाजी विक्रेता आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पुलाची अवस्था आहे बिकट

पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने बालिकेचा शोध सुरु आहे. बालिका मिळाल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे. अस्थायी पुलाची अवस्था चांगली नाही. त्यामुळेच बालिका नदीत पडली.

रमाकांत दुर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यशोधरानगर

जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात नागरिक

वांजरा, माजरी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मागील दोन वर्षांपासून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. येथे तयार करण्यात आलेला अस्थायी पुल जीवघेणा ठरत आहे. ज्या पुलावरून बालिका नदीत पडली त्या पुलाच्या दोन्ही बाजुला केवळ सिंगल पाईप लावलेले आहेत. त्यामुळे संतुलन बिघडून नदीत पडण्याचा धोका असतो. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाच्या महामार्ग निधीतून पिवळी नदीच्या वनदेवीनगर पुलाचे काम सुरु आहे. प्रशासनाने जून २०२० मध्ये हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या पुलाचे काम अपूर्ण आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू