शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 21:10 IST

विदर्भ राज्याच्या मागणीचा संघर्ष ११५ वर्ष जुना आहे. आजपर्यंत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने विदर्भाच्या मागणीला बगल देऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याला प्राधान्य दिले. परंतु यापुढे वेगळ्या विदर्भासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विविध विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे आवाहन : विदर्भ निर्माण महामंचची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्याच्या मागणीचा संघर्ष ११५ वर्ष जुना आहे. आजपर्यंत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने विदर्भाच्या मागणीला बगल देऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याला प्राधान्य दिले. परंतु यापुढे वेगळ्या विदर्भासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विविध विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी आज येथे केले.विदर्भ निर्माण महामंचच्यावतीने संविधान चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला दिल्लीचे समाज कल्याण मंत्री अ‍ॅड राजेंद्र पाल गौतम, विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड श्रीहरी अणे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अ‍ॅड सुरेश माने, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, जनमंचचे मुकेश समर्थ, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे उपस्थित होते. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे म्हणाले, विदर्भात बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे. परंतु त्यांना रोजगार देण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने पुढाकार घेतला नाही. वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको करून राज्याचे व्यवहार थांबविण्याची गरज आहे. विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक राम नेवले म्हणाले, विदर्भ निर्माण महामंचतर्फे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी गावागावात जाऊन लढा देऊ. भाजपाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असून निवडणुकीला आंदोलन समजुन लढण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे यांनी विदर्भाच्या विरोधकांना मतदान न करता विदर्भाच्या मागणीवर निवडणुका लढविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले, आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विदर्भाच्या मुद्याचे राजकारण केले. पहिल्यांदा विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा झालेला निर्णय झाला ही वेगळ्या विदर्भासाठी चांगले संकेत आहेत. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, मोदी सरकारने देशाला फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशाला वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून हटवून शेतकरी, शेतमजुरांचे सरकार स्थापन करण्याची गरज आहे. संचालन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वानखेडे यांनी केले. सभेला विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केजरीवालांसारखी इच्छाशक्ती हवी : राजेंद्र पाल गौतमदिल्लीचे समाज कल्याण मंत्री अ‍ॅड. राजेंद्र पाल गौतम म्हणाले, देशातील जंगल, खाण, जमिनीवर ९० टक्के नागरिकांचा अधिकार नाही. भाजपा, कॉंग्रेसने विदर्भाच्या मागणीवर भूलथापा देऊन मते घेतली. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नसून त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यास कॉंग्रेस, भाजपा जबाबदार आहे. केजरीवाल सरकारने विजेचे दर स्वस्त केले. शासकीय शाळांचा दर्जा सुधारला. या बाबी इतर राज्यात का होत नाहीत? समर्पण भावाने आंदोलन करून विदर्भ वेगळा करण्याचे आवाहन केले.सत्ता हस्तगत करून विदर्भ मिळवा : चटपवामनराव चटप म्हणाले, वेगळा विदर्भ ही स्वातंत्र्याची लढाई आहे. ११५ वर्षापासून फसवणूक करणाऱ्या नेत्यांना मतपेटीतून टक्कर देण्याची गरज आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सर्वांनी विदर्भ निर्माण महामंचच्या उमेदवारांना निवडुन द्यावे. रास्ता रोको, आंदोलन करण्याऐवजी सत्ता हस्तगत करून वेगळा विदर्भ पदरात पाडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.विदर्भवाद्यांनी निवडणुकीत उतरण्याची गरज : श्रीहरी अणेअ‍ॅड श्रीहरी अणे म्हणाले, आम्ही कुणाला हरविण्यासाठी किंवा जिंकविण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच तयार केला नसून स्वत:ला जिंकविण्यासाठी केला आहे. आजपर्यंत इतरांवर विश्वास ठेऊन पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे विदर्भ राज्य हवे असेल तर सत्तेला हात घालण्याची गरज असून निवडणुक हा एकमेव पर्याय आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भElectionनिवडणूक