शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 21:10 IST

विदर्भ राज्याच्या मागणीचा संघर्ष ११५ वर्ष जुना आहे. आजपर्यंत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने विदर्भाच्या मागणीला बगल देऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याला प्राधान्य दिले. परंतु यापुढे वेगळ्या विदर्भासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विविध विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे आवाहन : विदर्भ निर्माण महामंचची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्याच्या मागणीचा संघर्ष ११५ वर्ष जुना आहे. आजपर्यंत कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने विदर्भाच्या मागणीला बगल देऊन केवळ सत्ता हस्तगत करण्याला प्राधान्य दिले. परंतु यापुढे वेगळ्या विदर्भासाठी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून उमेदवार उभे करून मतपेटीतून विदर्भ मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विविध विदर्भवादी संघटनांच्या नेत्यांनी आज येथे केले.विदर्भ निर्माण महामंचच्यावतीने संविधान चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला दिल्लीचे समाज कल्याण मंत्री अ‍ॅड राजेंद्र पाल गौतम, विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड श्रीहरी अणे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अ‍ॅड सुरेश माने, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, जनमंचचे मुकेश समर्थ, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे उपस्थित होते. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे म्हणाले, विदर्भात बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे. परंतु त्यांना रोजगार देण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने पुढाकार घेतला नाही. वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको करून राज्याचे व्यवहार थांबविण्याची गरज आहे. विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक राम नेवले म्हणाले, विदर्भ निर्माण महामंचतर्फे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी गावागावात जाऊन लढा देऊ. भाजपाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असून निवडणुकीला आंदोलन समजुन लढण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे यांनी विदर्भाच्या विरोधकांना मतदान न करता विदर्भाच्या मागणीवर निवडणुका लढविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले, आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विदर्भाच्या मुद्याचे राजकारण केले. पहिल्यांदा विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा झालेला निर्णय झाला ही वेगळ्या विदर्भासाठी चांगले संकेत आहेत. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, मोदी सरकारने देशाला फसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशाला वाचविण्यासाठी भाजपाला सत्तेवरून हटवून शेतकरी, शेतमजुरांचे सरकार स्थापन करण्याची गरज आहे. संचालन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र वानखेडे यांनी केले. सभेला विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केजरीवालांसारखी इच्छाशक्ती हवी : राजेंद्र पाल गौतमदिल्लीचे समाज कल्याण मंत्री अ‍ॅड. राजेंद्र पाल गौतम म्हणाले, देशातील जंगल, खाण, जमिनीवर ९० टक्के नागरिकांचा अधिकार नाही. भाजपा, कॉंग्रेसने विदर्भाच्या मागणीवर भूलथापा देऊन मते घेतली. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नसून त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यास कॉंग्रेस, भाजपा जबाबदार आहे. केजरीवाल सरकारने विजेचे दर स्वस्त केले. शासकीय शाळांचा दर्जा सुधारला. या बाबी इतर राज्यात का होत नाहीत? समर्पण भावाने आंदोलन करून विदर्भ वेगळा करण्याचे आवाहन केले.सत्ता हस्तगत करून विदर्भ मिळवा : चटपवामनराव चटप म्हणाले, वेगळा विदर्भ ही स्वातंत्र्याची लढाई आहे. ११५ वर्षापासून फसवणूक करणाऱ्या नेत्यांना मतपेटीतून टक्कर देण्याची गरज आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सर्वांनी विदर्भ निर्माण महामंचच्या उमेदवारांना निवडुन द्यावे. रास्ता रोको, आंदोलन करण्याऐवजी सत्ता हस्तगत करून वेगळा विदर्भ पदरात पाडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.विदर्भवाद्यांनी निवडणुकीत उतरण्याची गरज : श्रीहरी अणेअ‍ॅड श्रीहरी अणे म्हणाले, आम्ही कुणाला हरविण्यासाठी किंवा जिंकविण्यासाठी विदर्भ निर्माण महामंच तयार केला नसून स्वत:ला जिंकविण्यासाठी केला आहे. आजपर्यंत इतरांवर विश्वास ठेऊन पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे विदर्भ राज्य हवे असेल तर सत्तेला हात घालण्याची गरज असून निवडणुक हा एकमेव पर्याय आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भElectionनिवडणूक