शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:01 IST

यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत.

ठळक मुद्देसंस्कार भारतीचे आयोजन : ‘गदिमा’ व सुधीर फडके यांना अनोखी स्वरांजली देणार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ५१ गावात एकूण १५१ एकदिवसीय नृत्यमय गीतरामायण कार्यक्रम सादर होणार आहेत. यात विदर्भातील सुमारे १००० गायक, वादक, नर्तक कलावंतांचा सहभाग राहणार आहे. संस्कार भारतीतर्फे मागील १५ वर्षांपासून नववर्ष अभिवादनाप्रसंगी गीतरामायण प्रस्तुतीचा उपक्रम राबविण्यात येतो.विदर्भातील ११ जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये गीतरामायण कार्यक्रम केले जाणार असून त्यासाठी संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष सूरमणी डॉ. कमल भोंडे, कार्याध्यक्ष सुधाकरराव अंबुसकर, उपाध्यक्ष श्याम देशपांडे, प्रांत संयोजक गजानन रानडे, अमर कुलकर्णी, सहसंयोजक डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. जयश्री वैष्णव यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत नागपूर शहरातील ५१ ठिकाणी नृत्य, नाट्यमय गीतरामायण प्रस्तुतीचे आयोजन करण्यात येणार आहे. नवोदित गायक व वादकांसाठी ३ मार्च रोजी नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांचे वय ५० वर्षांच्या आत आहे अशा इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्कार भारतीच्या नागपूर शहर अध्यक्ष कांचन गडकरी, शहर मंत्री मनोज श्रोती यांनी केले आहे.

टॅग्स :GeetramayanगीतरामायणVidarbhaविदर्भ