शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

नागपुरातील रामबागमध्ये गँगवॉर : नागरिक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:46 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

ठळक मुद्दे गुंडांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष : प्रतिस्पर्ध्याच्या घरावर सशस्त्र हल्ले : वाहनांची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही दिवशी येथे मोठा गुन्हा घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे गुंड निरपराध नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.रामबाग मैत्री बुद्धविहाराजवळ राहणारा कुख्यात गुंड भिकू राजा परचाके याने चार दिवसांपूर्वी त्याचा प्रतिस्पर्धी गुंड पलाश वासनिक याच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला होता. त्यावेळी पलाश वाचला. दुसऱ्या दिवशी परचाकेच्या गुंडांनी पुन्हा हैदोस घातला. त्याचा बदला घेण्यासाठी कुख्यात पलाश वासनिक, सनी चव्हाण, विकी दाभाडे आणि त्याच्या सशस्त्र साथीदारांनी बुधवारी मध्यरात्री भिकू परचाकेच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या घराचे दार तोडून भिकूला मारण्याचा प्रयत्न केला. भिकूची पत्नी उषा परचाके पुढे आली असता आरोपीने तिच्या अंगावरून तलवार फिरवून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यात ती जखमी झाली. तीन दिवसांपासून एकमेकांच्या घरावर हे गुंड हल्ले चढवत असल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी येथे बंदोबस्तही लावला आहे; मात्र त्याला न जुमानता गुंडांच्या या दोन्ही टोळ्या एकमेकांना धडा शिकविण्याच्या प्रयत्नात दहशत निर्माण करीत आहे. दरम्यान, उषा परचाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पलाश वासनिक याच्या तीन साथीदारांना अटक केली. पलाश मात्र फरार झाला. तर त्यापूर्वीच्या गुन्ह्यात आरोपी भिकू परचाके याचे ७ गुंड साथीदार पोलिसांच्या अटकेत आहेत. भिकू मात्र फरार आहे.तोडफोड, नुकसान भरपाई कोण देणार?तलाश आणि त्याच्या गुंड साथीदारांनी परिसरातील २० वाहनांची तोडफोड केली. गुंडांच्या टोळ्या आपला राग निरपराध नागरिकांच्या वाहनावर काढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. हे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर