शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:51 IST

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला.

ठळक मुद्देलाखो रुपये उकळले : बनावट नियुक्तीपत्र दिले१६ बेरोजगारांची तक्रार : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला. प्रमोद अनंतवार (रा. शांतिनगर), रोहित तभाने (वय ३६), अमित टेंभूर्णीकर (वय ३६) आणि श्रीधर भेंडे (सर्व रा. नागपूर) या चौघांनी सीताबर्डीतील लोहा पुलाजवळ इरिक्सन ग्लोबल टेक्नॉलॉजी आऊटसोर्सिंग प्रा. लि. नावाने जॉब प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. बेरोजगारांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचा उपरोक्त आरोपी दावा करीत होते. त्यांच्या या दाव्याला तिवसा (जि. अमरावती) जवळच्या समुद्रपूर गावातील दिनेश मनोहर पुनसे आणि त्यांचे १५ मित्र बळी पडले. २२ जून २०१७ ला या सर्वांना आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली २ लाख, ९६ हजारांची रक्कम उकळली. बरेच दिवस होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुनसे आणि अन्य त्याच्या मित्रांनी आरोपींवर दबाव वाढवला. त्यामुळे त्यांना आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन हे बेरोजगार संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले असता आरोपींनी दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्यामुळे पीडित बेरोजगारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेतली असता तेथे कोणताही आरोपी आढळला नाही. एवढेच काय त्यांनी त्यांचे कार्यालय बंद करून पळ काढल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.१५ हजारात जिल्हा समन्वयकआरोपी प्रमोद अनंतवार हा या चौकडीतील दलाल आहे. तो गावोगावच्या बेरोजगारांना हेरून त्यांच्यावर जाळे टाकायचा. तर, कार्यालयात बसलेले तभाने, टेंभूर्णीकर आणि भेंडे बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. प्रारंभी १५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली जायची. नोकरी लागल्यानंतर १५ ते २० हजार रुपये पुन्हा आम्ही एजंसीला देऊ, अशी हमीदेखिल आरोपी बेरोजगारांकडून घेत होते. केवळ १५ हजारात राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रात जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा समुपदेशक पदावर नियुक्ती करून देऊ, असे आरोपींनी पीडितांना सांगितले होते. तसे नियुक्तीपत्रही त्यांनी तक्रार करणा-या बेरोजगारांना दिले होते.वर्धा, यवतमाळचेही पीडितआरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांनी केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या फसगतीची त्यांना कल्पनाच नाही. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे आता पीडित तक्रारदारांची संख्या वाढू शकते, असे पोलीस सांगतात. दरम्यान, आज दुपारी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रमोद अनंतवार वगळता अन्य तिघांना अटक केली. त्यांना सायंकाळी कोर्टात हजर करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला. ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी या आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यांनी किती बेरोजगारांकडून अशा प्रकारे रक्कम उकळली, त्याचा चौकशीत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे