शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:51 IST

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला.

ठळक मुद्देलाखो रुपये उकळले : बनावट नियुक्तीपत्र दिले१६ बेरोजगारांची तक्रार : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला. प्रमोद अनंतवार (रा. शांतिनगर), रोहित तभाने (वय ३६), अमित टेंभूर्णीकर (वय ३६) आणि श्रीधर भेंडे (सर्व रा. नागपूर) या चौघांनी सीताबर्डीतील लोहा पुलाजवळ इरिक्सन ग्लोबल टेक्नॉलॉजी आऊटसोर्सिंग प्रा. लि. नावाने जॉब प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. बेरोजगारांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचा उपरोक्त आरोपी दावा करीत होते. त्यांच्या या दाव्याला तिवसा (जि. अमरावती) जवळच्या समुद्रपूर गावातील दिनेश मनोहर पुनसे आणि त्यांचे १५ मित्र बळी पडले. २२ जून २०१७ ला या सर्वांना आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली २ लाख, ९६ हजारांची रक्कम उकळली. बरेच दिवस होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुनसे आणि अन्य त्याच्या मित्रांनी आरोपींवर दबाव वाढवला. त्यामुळे त्यांना आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन हे बेरोजगार संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले असता आरोपींनी दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्यामुळे पीडित बेरोजगारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेतली असता तेथे कोणताही आरोपी आढळला नाही. एवढेच काय त्यांनी त्यांचे कार्यालय बंद करून पळ काढल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.१५ हजारात जिल्हा समन्वयकआरोपी प्रमोद अनंतवार हा या चौकडीतील दलाल आहे. तो गावोगावच्या बेरोजगारांना हेरून त्यांच्यावर जाळे टाकायचा. तर, कार्यालयात बसलेले तभाने, टेंभूर्णीकर आणि भेंडे बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. प्रारंभी १५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली जायची. नोकरी लागल्यानंतर १५ ते २० हजार रुपये पुन्हा आम्ही एजंसीला देऊ, अशी हमीदेखिल आरोपी बेरोजगारांकडून घेत होते. केवळ १५ हजारात राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रात जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा समुपदेशक पदावर नियुक्ती करून देऊ, असे आरोपींनी पीडितांना सांगितले होते. तसे नियुक्तीपत्रही त्यांनी तक्रार करणा-या बेरोजगारांना दिले होते.वर्धा, यवतमाळचेही पीडितआरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांनी केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या फसगतीची त्यांना कल्पनाच नाही. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे आता पीडित तक्रारदारांची संख्या वाढू शकते, असे पोलीस सांगतात. दरम्यान, आज दुपारी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रमोद अनंतवार वगळता अन्य तिघांना अटक केली. त्यांना सायंकाळी कोर्टात हजर करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला. ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी या आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यांनी किती बेरोजगारांकडून अशा प्रकारे रक्कम उकळली, त्याचा चौकशीत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे