शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

नागपुरात नोकरीच्या नावावर फसवणूक करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:42 IST

नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षणाच्या नावावर ओढतात जाळ्यात : अनेक बेरोजगार युवक-युवतींना फसवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.पीडित मुलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशिष डोंगरे असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरून जाहिरात दिली. यात प्रशिक्षण देऊन नागपुरातील विविध नामांकित कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३० मे २०१८ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुरम हॉल झांशी राणी चौक सीताबर्डी येथे बोलावले. या ठिकाणी अनेक बेरोजगार युवक-युवती आले. आपण दरमहा १५ ते २५ हजार रुपयाची नोकरी लावून देतो, असे सांगितले, परंतु त्यासाठी महिनाभराचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ६,८०० रुपये भरण्यास सांगितले. नोकरी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी पैसे भरले. पैसे घेतल्यानंतर बर्डी येथीलच एका प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी बोलावले. एक महिन्यानंतर येथे वेगवेगळ्या कंपन्या येतील, तेथे तुम्हाला नोकरी मिळेल, असे सांगितले. बेरोजगार युवक-युवकांनी एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. महिना होऊनही एकाही कंपनीचे प्रतिनिधी आले नाही. कुणाला नोकरीही मिळाली नाही. तेव्हा डोंगरे याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर बेरोजगार युवक-युवतींना शंका आली. त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र मागितले. तेव्हा आज देतो उद्या देतो असे म्हणत अनेक दिवस टाळले. डोंगरे याच्यासोबत काम करणारी एक तरुणी सर्वांना फोन करून प्रशिक्षणासाठी बोलावते.डोंगरे याचे पूर्वी धंतोली येथे कार्यालय होते, ते त्याने बदलविले आहे. नवीन कार्यालयाबाबत त्याचे साथीदारही काही सांगत नाहीत. एकूणच हा सर्व प्रकार पाहता बेरोजगार तरुण-तरुणींना आपण फसवल्या गेल्याचे लक्षात आले. तेव्हा या पीडितांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी याबाबतची तक्रार सीताबर्डी व धंतोली पोलिसांकडे केली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांकडेही याची तकार केली आहे. फसवल्या गेलेल्या बेरोजगार तरुण तरुणींची संख्या कितीतरी अधिक असून कोट्यवधीची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तक्रार अर्ज मिळाला, चौकशी सुरू आहेनोकरीच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याबाबत पीडित युवकांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपनिरीक्षक घोडे यांनी सांगितले.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हनोकरीच्या नावावर फसवणूक होत असल्याचे प्रकार हे नवीन नाहीत. सातत्याने असे प्रकार सुरू आहेत. व्यक्तिगतरीत्या कुणी फसवणूक केली असेल तर ती बाब समजली जाऊ शकते. परंतु जाहिरात देऊन, मोठमोठे आमीष दाखवून लोकांची फसवणूक होत असेल तर पोलीस करतात तरी काय? अशाच जाहिरातींद्वारे मोठमोठे आमिष दाखवून लोकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार नागपुरात यापूर्वी झालेले आहेत. त्यानंतरही पोलिसांनी कुठलाही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. सोशल मीडियावर कोण काय पोस्ट करीत आहे, यावर पाळत ठेवणाºया पोलिसांचे अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी