शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

नागपुरात नोकरीच्या नावावर फसवणूक करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:42 IST

नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षणाच्या नावावर ओढतात जाळ्यात : अनेक बेरोजगार युवक-युवतींना फसवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या टोळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले शिकार बनवले. फसवल्या गेलेल्या पीडित मुलांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. धंतोली पोलीस याचा शोध घेत आहे.पीडित मुलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशिष डोंगरे असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरून जाहिरात दिली. यात प्रशिक्षण देऊन नागपुरातील विविध नामांकित कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३० मे २०१८ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुरम हॉल झांशी राणी चौक सीताबर्डी येथे बोलावले. या ठिकाणी अनेक बेरोजगार युवक-युवती आले. आपण दरमहा १५ ते २५ हजार रुपयाची नोकरी लावून देतो, असे सांगितले, परंतु त्यासाठी महिनाभराचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ६,८०० रुपये भरण्यास सांगितले. नोकरी मिळेल या अपेक्षेने अनेकांनी पैसे भरले. पैसे घेतल्यानंतर बर्डी येथीलच एका प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी बोलावले. एक महिन्यानंतर येथे वेगवेगळ्या कंपन्या येतील, तेथे तुम्हाला नोकरी मिळेल, असे सांगितले. बेरोजगार युवक-युवकांनी एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. महिना होऊनही एकाही कंपनीचे प्रतिनिधी आले नाही. कुणाला नोकरीही मिळाली नाही. तेव्हा डोंगरे याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर बेरोजगार युवक-युवतींना शंका आली. त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र मागितले. तेव्हा आज देतो उद्या देतो असे म्हणत अनेक दिवस टाळले. डोंगरे याच्यासोबत काम करणारी एक तरुणी सर्वांना फोन करून प्रशिक्षणासाठी बोलावते.डोंगरे याचे पूर्वी धंतोली येथे कार्यालय होते, ते त्याने बदलविले आहे. नवीन कार्यालयाबाबत त्याचे साथीदारही काही सांगत नाहीत. एकूणच हा सर्व प्रकार पाहता बेरोजगार तरुण-तरुणींना आपण फसवल्या गेल्याचे लक्षात आले. तेव्हा या पीडितांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी याबाबतची तक्रार सीताबर्डी व धंतोली पोलिसांकडे केली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांकडेही याची तकार केली आहे. फसवल्या गेलेल्या बेरोजगार तरुण तरुणींची संख्या कितीतरी अधिक असून कोट्यवधीची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तक्रार अर्ज मिळाला, चौकशी सुरू आहेनोकरीच्या नावावर फसवणूक करण्यात आल्याबाबत पीडित युवकांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपनिरीक्षक घोडे यांनी सांगितले.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हनोकरीच्या नावावर फसवणूक होत असल्याचे प्रकार हे नवीन नाहीत. सातत्याने असे प्रकार सुरू आहेत. व्यक्तिगतरीत्या कुणी फसवणूक केली असेल तर ती बाब समजली जाऊ शकते. परंतु जाहिरात देऊन, मोठमोठे आमीष दाखवून लोकांची फसवणूक होत असेल तर पोलीस करतात तरी काय? अशाच जाहिरातींद्वारे मोठमोठे आमिष दाखवून लोकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार नागपुरात यापूर्वी झालेले आहेत. त्यानंतरही पोलिसांनी कुठलाही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. सोशल मीडियावर कोण काय पोस्ट करीत आहे, यावर पाळत ठेवणाºया पोलिसांचे अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी