शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:34 IST

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतरुण-तरुणींचा गुलालाकडे कानाडोळा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही वर्षांपासून तरुण-तरुणींमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची क्रेझ निर्माण झाली आहे. सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचा थरच्या थर जमलेला दिसायचा. आता गुलालाची उधळण कमी पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.चांगल्या प्रतीचा गुलाल ६०ते ७० रुपयेठोक व्यापारी ललित आमेसर म्हणाले, इतवारी गुलालासाठी विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून गुलाल सर्वत्र विक्रीसाठी जातो. पण कालांतराने पर्यावरणपूरक संस्कृतीमुळे गुलालाच्या विक्रीत घसरण होऊ लागली. आता जवळपास १ कोटीपर्यंत उरली आहे. त्यामुळे निर्मातेही कमी झाले आहेत. नागपुरात गुलाल निर्मितीचे लघु उत्पादक जवळपास ३० च्या आसपास आहेत. पूर्वी ५० पेक्षा जास्त होते. विक्री कमी होऊ लागल्याने उत्पादनही कमी होऊ लागले. माल निर्मितीनंतर पूर्ण गुलाल विकला जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे उत्पादकही फारच कमी निर्मिती करतात. गुलालाची निर्मिती स्टार्चपासून करण्यात येते. शिवाय चांगल्या प्रतीच्या रंगाच्या किमतीही महागल्या आहेत. त्यामुळे ठोक बाजारात गुलाल प्रती किलो ४० ते ४५ आणि उच्च प्रतीचा ५० ते ५५ रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ६० ते ८० रुपयांदरम्यान भाव आहेत. गुलाल लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा रंगात २५ किलोच्या थैलीत उपलब्ध आहे. सणांनुसार रंगाची निवड करून गुलालाची खरेदी करण्यात येत असल्याचे आमेसर यांनी सांगितले.गुलालाचे उत्पादक कमीगुलालाची निर्मिती लालगंज, शांतिनगर, नाईक तलाव, नवीन शुक्रवारी या भागात केली जाते. पूर्वीच्या तुलनेत कच्चा मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. उत्पादकांनी सांगितले की, कच्चा माल रोखीत खरेदी करावा लागतो. पण विकताना उधारीत द्यावा लागतो. गुलाल विक्रीचे पैसे मिळविण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. नफाही कमी झाला आहे. भाव वाढल्यामुळे आणि पर्यावरणपूक संस्कृतीमुळे सार्वजनिक मंडळाकडून खरेदी कमी झाली आहे. याच कारणांनी अनेकांनी निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. धार्मिक कार्यात गुलालाचे महत्त्व असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर