शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:34 IST

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतरुण-तरुणींचा गुलालाकडे कानाडोळा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही वर्षांपासून तरुण-तरुणींमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची क्रेझ निर्माण झाली आहे. सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचा थरच्या थर जमलेला दिसायचा. आता गुलालाची उधळण कमी पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.चांगल्या प्रतीचा गुलाल ६०ते ७० रुपयेठोक व्यापारी ललित आमेसर म्हणाले, इतवारी गुलालासाठी विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून गुलाल सर्वत्र विक्रीसाठी जातो. पण कालांतराने पर्यावरणपूरक संस्कृतीमुळे गुलालाच्या विक्रीत घसरण होऊ लागली. आता जवळपास १ कोटीपर्यंत उरली आहे. त्यामुळे निर्मातेही कमी झाले आहेत. नागपुरात गुलाल निर्मितीचे लघु उत्पादक जवळपास ३० च्या आसपास आहेत. पूर्वी ५० पेक्षा जास्त होते. विक्री कमी होऊ लागल्याने उत्पादनही कमी होऊ लागले. माल निर्मितीनंतर पूर्ण गुलाल विकला जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे उत्पादकही फारच कमी निर्मिती करतात. गुलालाची निर्मिती स्टार्चपासून करण्यात येते. शिवाय चांगल्या प्रतीच्या रंगाच्या किमतीही महागल्या आहेत. त्यामुळे ठोक बाजारात गुलाल प्रती किलो ४० ते ४५ आणि उच्च प्रतीचा ५० ते ५५ रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ६० ते ८० रुपयांदरम्यान भाव आहेत. गुलाल लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा रंगात २५ किलोच्या थैलीत उपलब्ध आहे. सणांनुसार रंगाची निवड करून गुलालाची खरेदी करण्यात येत असल्याचे आमेसर यांनी सांगितले.गुलालाचे उत्पादक कमीगुलालाची निर्मिती लालगंज, शांतिनगर, नाईक तलाव, नवीन शुक्रवारी या भागात केली जाते. पूर्वीच्या तुलनेत कच्चा मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. उत्पादकांनी सांगितले की, कच्चा माल रोखीत खरेदी करावा लागतो. पण विकताना उधारीत द्यावा लागतो. गुलाल विक्रीचे पैसे मिळविण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. नफाही कमी झाला आहे. भाव वाढल्यामुळे आणि पर्यावरणपूक संस्कृतीमुळे सार्वजनिक मंडळाकडून खरेदी कमी झाली आहे. याच कारणांनी अनेकांनी निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. धार्मिक कार्यात गुलालाचे महत्त्व असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर