शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:34 IST

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतरुण-तरुणींचा गुलालाकडे कानाडोळा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही वर्षांपासून तरुण-तरुणींमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची क्रेझ निर्माण झाली आहे. सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचा थरच्या थर जमलेला दिसायचा. आता गुलालाची उधळण कमी पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.चांगल्या प्रतीचा गुलाल ६०ते ७० रुपयेठोक व्यापारी ललित आमेसर म्हणाले, इतवारी गुलालासाठी विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून गुलाल सर्वत्र विक्रीसाठी जातो. पण कालांतराने पर्यावरणपूरक संस्कृतीमुळे गुलालाच्या विक्रीत घसरण होऊ लागली. आता जवळपास १ कोटीपर्यंत उरली आहे. त्यामुळे निर्मातेही कमी झाले आहेत. नागपुरात गुलाल निर्मितीचे लघु उत्पादक जवळपास ३० च्या आसपास आहेत. पूर्वी ५० पेक्षा जास्त होते. विक्री कमी होऊ लागल्याने उत्पादनही कमी होऊ लागले. माल निर्मितीनंतर पूर्ण गुलाल विकला जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे उत्पादकही फारच कमी निर्मिती करतात. गुलालाची निर्मिती स्टार्चपासून करण्यात येते. शिवाय चांगल्या प्रतीच्या रंगाच्या किमतीही महागल्या आहेत. त्यामुळे ठोक बाजारात गुलाल प्रती किलो ४० ते ४५ आणि उच्च प्रतीचा ५० ते ५५ रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ६० ते ८० रुपयांदरम्यान भाव आहेत. गुलाल लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा रंगात २५ किलोच्या थैलीत उपलब्ध आहे. सणांनुसार रंगाची निवड करून गुलालाची खरेदी करण्यात येत असल्याचे आमेसर यांनी सांगितले.गुलालाचे उत्पादक कमीगुलालाची निर्मिती लालगंज, शांतिनगर, नाईक तलाव, नवीन शुक्रवारी या भागात केली जाते. पूर्वीच्या तुलनेत कच्चा मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. उत्पादकांनी सांगितले की, कच्चा माल रोखीत खरेदी करावा लागतो. पण विकताना उधारीत द्यावा लागतो. गुलाल विक्रीचे पैसे मिळविण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. नफाही कमी झाला आहे. भाव वाढल्यामुळे आणि पर्यावरणपूक संस्कृतीमुळे सार्वजनिक मंडळाकडून खरेदी कमी झाली आहे. याच कारणांनी अनेकांनी निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. धार्मिक कार्यात गुलालाचे महत्त्व असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर