शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

गणेश विसर्जन : नागपुरात पीसी टू सीपी सारेच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:48 IST

घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.

ठळक मुद्देपोलीसदादा २२ तास अविश्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी थेट रस्त्यावर उतरून स्वत:ही पहाटेपर्यंत दक्षपणे कर्तव्य बजावल्याने नागपुरात गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रविवारी सकाळी ७ वाजतापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शहर पोलीस दलातील पीसी टू सीपी (पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त) पर्यंत शिस्तीत आणि समंजसपणे कर्तव्य बजावत राहिले.गणोशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरून वाद होतात. हाणामाऱ्या घडतात. अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण होते. यावेळीही अनेक शहरात असे कटू प्रकार घडले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मात्र सुरुवातीपासूनच गणेशोत्सवादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केले होते. १० दिवस बाप्पांचा महाउत्सव पार पडल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची विशेष तयारी केली होती. परिणामी बाप्पांचा महाउत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.विसर्जनाच्या प्रमुख ठिकाणी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, कोराडी, कळमना तलाव, महादेव घाट कामठी, वाडी आणि हिंगणा भागातील काही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. वाहतुकीला अडसर निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणांहून वाहतुकीचा मार्ग तात्पुरता वळविण्यात आला होता. मिरवणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहून काही समाजकंटक छेड काढणे, संवेदनशील ठिकाणी दगडफेक करणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळणे असे प्रकार जाणीवपूर्वक करू पाहतात. ते होऊ नये म्हणून रस्त्यारस्त्यावर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपद्रवी व्यक्तींना जेरबंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीत सहभागी झाले होते. अशा प्रकारे नियोजनपूर्वक बंदोबस्त करण्यात आल्याने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.पोलीस आयुक्त पहाटेपर्यंतरविवारी सकाळी ७ वाजतापासून सात पोलीस उपायुक्तांसह २०० पोलीस अधिकारी आणि १७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या कर्तव्यावर रुजू झाले होते. तब्बल २२ तास ते अविश्रांत कर्तव्यावर होते. त्यातील अनेकांनी जेवणही उभ्या उभ्याच केले होते. विशेष म्हणजे, बंदोबस्ताचे नियोजन करणारे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय स्वत: अनेक विसर्जनस्थळी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करीत होते. दिवसभर फिरून त्यांनी वेगवेगळ्या भागातील रस्त्यावरील बंदोबस्ताची पाहणी केली. विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी फुटाळा तलावावर होती. तेथे रात्री ७ नंतर ९ आणि त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता पोलीस आयुक्त आले. गर्दी वाढल्याचे पाहून ते पहाटे ३.४५ वाजतापर्यंत फुटाळा तलावावर हजर होते.

टॅग्स :PoliceपोलिसGanesh Visarjanगणेश विसर्जन