शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Ganesh Festival 2018: सच्चा धर्म नही जाना तुने रे भाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:22 IST

माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देसत्यपाल महाराजांनी केले अंतर्मुख : दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.महाल येथील श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गुरुवारी सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. गणरायाच्या आराधनेनंतर ‘भाई भज भज गुरु के नाम...’ या भजनाने त्यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. ‘मी तुम्हाला पाच हजार वर्षांच काही सांगत नाही. मी आजची परिस्थिती सांगतो. मला मोह तुकडोजी बाबा, गाडगे बाबांच्या विचारांचा आहे. मी ५२ वर्षांत १४ हजार गावात कीर्तन केले’, असे सांगत त्यांनी धर्मकारण, समाजकारण व राजकारणावर प्रबोधन केले. कुटुंब एकत्रित यावे, आपण संघटित व्हावे, स्वत:पेक्षा समाजाचा, देशाचा विचार करावा, यासाठी या मंडळाच्या तरुणांनी ९९ वर्षांपासूनची परंपरा जोपासली आहे. सर्व जातीपातीचे लोक एकत्र आले. तरुणपिढी भलतीकडेच आॅनलाईन झाली आहे. महापुरुषांच्या विचारांनी एकमेकांसोबत आॅनलाईन असणारे समाज घडवितात. धर्म-अध्यात्माच्या नावाने सामान्य माणसांना मूर्ख बनविले जात आहे, महिलांचे शोषण केले जात आहे, असे सांगताना ‘हो पुत्रवती, मरो तुझा पती, उद्या लागो रामपालच्या हाती...’असे म्हणत खास त्यांच्याच शैलीत भोंदूबाबांवर टीका केली. स्त्रियांनो ‘चूल आणि मूल’चे दिवस संपले आहेत, घाबरू नका, दुर्गादेवीच्या रूपातील फोटो फेसबुकवर टाका, असे आवाहन त्यांनी केले. ‘देहाची तिजोरी, दारू त्यात ठेवा, उघड बार देवा आता उघड बार देवा...’ या मिश्किल गीतातून व्यसनाधिनतेवर टीका करीत त्यांनी तरुणांना व्यसनापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव हा जीवनाला घडविणारा उत्सव आहे. म्हणून तरुणांनो शिक्षणाचा संक ल्प घ्या, व्यसन सोडा, मुलींची छेड करू नका, असा संदेश त्यांनी दिला.आयोजनात मंडळाचे मार्गदर्शक कृष्णाजी पाठक, विनोद राव, गिरीश पुराणिक, रॉबीन जयपूरकर, रोहित पागे, लखन हिवसे यांच्यासह संजय राव, मधुकर पौनीकर, विवेक धाक्रस आदींचा समावेश होता.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nagpurनागपूर