शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

Ganesh Festival 2018: सच्चा धर्म नही जाना तुने रे भाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:22 IST

माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देसत्यपाल महाराजांनी केले अंतर्मुख : दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माईकवर सप्तखंजेरीची थाप पडली आणि पुढचे दोन-अडीच तास समाजाला तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा संदेश देणारे अवलिया सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन निनादत राहिले. गणरायांनी तुम्हा सर्वांना एकत्रित आणले. तुकडोजींच्या ‘सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई...’ या भजनातून दिवस-रात्र पूजापाठ, आरती केल्याने देव भेटणार नाही. देव शिक्षण घेतल्याने, उद्योग केल्याने आणि स्वच्छतेत भेटेल. रक्तदान करा, नेत्रदान आणि अवयवदान करा. मिश्किल शैलीतील आपल्या चिरपरिचित अंदाजात अध्यात्माच्या नावाने पसरलेल्या बुवाबाजीपासून ते राजकारणापर्यंत आणि महिला अत्याचारापासून अंधश्रद्धा यावर कठोर प्रहार करीत त्यांनी उपस्थित भाविकांना खळखळून हसवितानाच अंतर्मुख होण्यास भाग पाडले.महाल येथील श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गुरुवारी सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. गणरायाच्या आराधनेनंतर ‘भाई भज भज गुरु के नाम...’ या भजनाने त्यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. ‘मी तुम्हाला पाच हजार वर्षांच काही सांगत नाही. मी आजची परिस्थिती सांगतो. मला मोह तुकडोजी बाबा, गाडगे बाबांच्या विचारांचा आहे. मी ५२ वर्षांत १४ हजार गावात कीर्तन केले’, असे सांगत त्यांनी धर्मकारण, समाजकारण व राजकारणावर प्रबोधन केले. कुटुंब एकत्रित यावे, आपण संघटित व्हावे, स्वत:पेक्षा समाजाचा, देशाचा विचार करावा, यासाठी या मंडळाच्या तरुणांनी ९९ वर्षांपासूनची परंपरा जोपासली आहे. सर्व जातीपातीचे लोक एकत्र आले. तरुणपिढी भलतीकडेच आॅनलाईन झाली आहे. महापुरुषांच्या विचारांनी एकमेकांसोबत आॅनलाईन असणारे समाज घडवितात. धर्म-अध्यात्माच्या नावाने सामान्य माणसांना मूर्ख बनविले जात आहे, महिलांचे शोषण केले जात आहे, असे सांगताना ‘हो पुत्रवती, मरो तुझा पती, उद्या लागो रामपालच्या हाती...’असे म्हणत खास त्यांच्याच शैलीत भोंदूबाबांवर टीका केली. स्त्रियांनो ‘चूल आणि मूल’चे दिवस संपले आहेत, घाबरू नका, दुर्गादेवीच्या रूपातील फोटो फेसबुकवर टाका, असे आवाहन त्यांनी केले. ‘देहाची तिजोरी, दारू त्यात ठेवा, उघड बार देवा आता उघड बार देवा...’ या मिश्किल गीतातून व्यसनाधिनतेवर टीका करीत त्यांनी तरुणांना व्यसनापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव हा जीवनाला घडविणारा उत्सव आहे. म्हणून तरुणांनो शिक्षणाचा संक ल्प घ्या, व्यसन सोडा, मुलींची छेड करू नका, असा संदेश त्यांनी दिला.आयोजनात मंडळाचे मार्गदर्शक कृष्णाजी पाठक, विनोद राव, गिरीश पुराणिक, रॉबीन जयपूरकर, रोहित पागे, लखन हिवसे यांच्यासह संजय राव, मधुकर पौनीकर, विवेक धाक्रस आदींचा समावेश होता.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nagpurनागपूर