शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरातूनच गांधीजी सर्वमान्य ‘महात्मा’ झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

नागपूर : १९२० साली डिसेंबर महिन्यात नागपूरला झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले होते. या अधिवेशनातून काँग्रेसच्या ...

नागपूर : १९२० साली डिसेंबर महिन्यात नागपूरला झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले होते. या अधिवेशनातून काँग्रेसच्या कार्याची आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाची दिशाच बदलून टाकली. या अधिवेशनापासूनच गांधीजींचे नेतृत्व काँग्रेस प्रतिनिधी आणि जनमानसानेही स्वीकारले होते. त्यांनी दिलेले सत्य, अहिंसा, स्वराज, असहयोग, चरखा व स्वदेशी हे मूलमंत्र आंदोलनाचे शस्त्र म्हणून स्वीकृत झाले. महत्त्वाचे म्हणजे नागपूर अधिवेशनातच गांधीजींना दिलेल्या ‘महात्मा’ या उपाधीला सर्वमान्यता मिळाली होती.

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील ‘स्वातंत्र्याचे आंदोलन आणि नागपूर’ या पुस्तकात काँग्रेसच्या या अधिवेशनाची सविस्तर माहिती आपल्याला अभ्यासाला मिळते. त्यावेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेचा लढा पूर्ण करून नुकतेच भारतात आले होते आणि चंपारणचा सत्याग्रह यशस्वी केला होता. सहा महिन्यापूर्वीच लोकमान्य टिळक यांचे निधन झाले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत भारतीयांमध्ये उदासीनता दिसून आली होती व त्यानंतर कोलकाता येथील अधिवेशनातही मरगळ दिसून आली. अशा पार्श्वभूमीवर नागपूर अधिवेशनाने मात्र स्वातंत्र्य लढ्यात उत्साह भरला. त्यावेळी शहरातील क्रॉडक टाऊन (काँग्रेसनगर) येथे अधिवेशनासाठी विशाल मंडप सजविण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे देशभरातून १६००० च्यावर प्रतिनिधी येथे सहभागी झाले होते. सर्व स्वदेशी परिवेशात होते व बहुतेकांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. नंतर हीच टोपी राष्ट्रीय सेवेचे प्रतीक ठरली. रेल्वे स्टेशनपासून अधिवेशन स्थळापर्यंत मोठा जुलूस काढण्यात आला होता. अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले विनय राघवा चारियार हे नेतृत्व करीत होते. गांधीजी यांच्यासह मोतीलाल नेहरू, पं. नेहरू, पं. महामना, मदन मोहन मालवीय, लाला लाजपतराय, सी.आर. दास, एम.ए. जिना, मौलाना आझाद, मोहम्मद व शौकत आली आदी सर्व मोठे नेते या अधिवेशनासाठी हजर झाले होते. व्यासपीठावर लोकमान्य टिळकांचे तैलचित्र लावण्यात आले होते. प्रतिनिधी व प्रेक्षकांसह २२००० च्यावर लोक अधिवेशनात हजर झाले होते. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे सदस्यही या अधिवेशनात सहभागी झाले होते.

या अधिवेशनातच गांधीजींकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपविले होते. संपूर्ण अधिवेशनाला गांधीमय रूप आले होते. त्यांनी मांडलेले संपूर्ण स्वराज, स्वदेशी व ब्रिटिश सरकारला असहकार्य करण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते स्वीकृत करण्यात आले. गांधीजींनी स्वत: हे प्रस्ताव विस्तृतपणे समजाविले. आतापर्यंत एका वर्ग संघटनेपुरती मर्यादित राहिलेली काँग्रेस व स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधी यांनी जनसामान्यांमध्ये नेऊन ठेवली होती व या नव्या नेतृत्वाच्या प्रवाहाला नागपूर अधिवेशन हे फलदायी ठरले होते. अधिवेशनाचा संपूर्ण परिसर ‘गांधी’ नावाच्या ‘महात्मा’च्याजय जयकाराने दणाणून गेला होता. देशाचे राजकारण व स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या नेतृत्वाचा उदय नागपूर अधिवेशनातून झाला होता.

असहकार आंदाेलनाची रूपरेखा ठरली

असहकार आंदोलनाची सविस्तर भूमिका त्यांनी समजावली. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा-महाविद्यालयात जाणे बंद करावे. याप्रमाणे शिक्षक, प्रबंध संचालक व आश्रय दात्यांनी मदत बंद करावी, वकिलांनी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी असहकार्य सुरू करावे, एवढेच नाही तर सेना व पोलीस विभागानेही राष्ट्रभक्ती जागवून असहकार्याला सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापारी व व्यावसायिकांनी विदेशी मालाचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तूंना विक्रीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. आणि हे संपूर्ण आंदोलन सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच चालविण्याचा आग्रह गांधीजींनी केला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या या आवाहनाला एकमुखाने मंजुरी प्रदान करण्यात आली. यापूर्वी ज्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला त्यांनाही जनमानसांच्या रेट्यापुढे नमावे लागले. एकटे जिना वगळता काँग्रेसचे सर्व प्रतिनिधी या नव्या प्रवाहाला समर्पित झाले होते.