शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गांधी कुटुंबीयाला देशाचा रिमोट कंट्रोल हाती हवा आहे : उमा भारती यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 01:09 IST

काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.

ठळक मुद्देलोधी समाजाचे स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू कलेक्शन’ करायचे असल्याचा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांनी मंगळवारी केला.नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ लोधी क्षेत्रीय समाजाच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उमा भारती उपस्थित होत्या. चौकीदार केवळ श्रीमंतांचाच असतो, प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या की, प्रियंका गांधींना चौकीदारचा अर्थ समजला नाही. चौकीदार हा गावातही असतो आणि तो गावात कुठलीही गडबड होणार नाही, यासाठी दक्ष असतो. ‘न खाऊंगा न खाने दुंगा’म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला प्रत्येक शहर आणि गावात चौकीदार ठेवायचा आहे. काँग्रेसचा २०१९ च्या निवडणुकीतील नारा गरिबी हटाव, बेरोजगारी हटावचा आहे. जनतेने खरे तर त्यांनाच विचारले पाहिजे ५० वर्षे देशाची सत्ता भोगल्यानंतरही देशातील गरिबी, बेरोजगारी का नाही हटली. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, किशोर कुमेरिया आदी उपस्थित होते.मी राजकारण सोडले नाहीमला इच्छित ठिकाणी उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यानंतर मंत्रिपदही मिळाले असते. पण, गंगा शुद्धिकरणाचे थोडे काम अजूनही शिल्लक आहे. उर्वरित कार्यासाठी मंत्री नाही तर लोकांना जोडणारा दुवा हवा आहे. या कार्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे, म्हणूनच यंदाची निवडणूक लढविली नाही. परंतु पुढच्या निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी निश्चितच सांभाळेल. राजकारणातील ‘कट ऑफ'ची ७५ वर्षे मानलीत तरी आपल्याकडे अजूनही १७ वर्षे शिल्लक आहेत. सध्या माझी क्रेडिबिलिटी गंगेशी कनेक्ट आहे. पक्षाने मला राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवून माझ्या कार्याचाही सन्मान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राममंदिर आमच्या आस्थेचा मुद्दाकाँग्रेस पक्षाकडून राममंदिराच्या मुद्यावर राजकारण होत आहे. राममंदिर हा प्रचाराचा मुद्दा नसून तो आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे भाजपाच्या मॅनिफे स्टोमध्ये राममंदिर निर्माणचा समावेश राहणार आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती करीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUma Bhartiउमा भारतीNitin Gadkariनितीन गडकरी