शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एकसंघ राहण्याचा गांधी-चतुर्वेदींचा काँग्रेसजनांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात ...

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवायचा असेल तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच सत्कार सोहळ्याला मुत्तेमवार-ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले.

शंकरनगर चौकातून राष्ट्रभाषा संकुलात आयोजित छोटेखानी सोहळ्यात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, रामकिशन ओझा, नरू जिचकार, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, तक्षशिला वाघधरे, नंदा पराते, रवींद्र दरेकर, हैदरअली दोसानी आदींचा सत्कार करण्यात आला. मात्र, मुत्तेमवार-ठाकरे गटाचे उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रा. विजय बारसे यांनी मात्र वेगवेगळी कारणे देत दांडी मारली. या सर्वांची अनुपस्थिती उपस्थितांनाही खटकली. त्यामुळे भविष्यातही गटबाजी थांबेल याबाबतच शंकाच आहे. प्रास्ताविक अतुल कोटेचा यांनी केले. श्रीराम काळे यांनी आभार मानले.

ईडी, सीबीआयने त्रास दिला तरी काही बिघडत नाही : चतुर्वेदी

- काँग्रेसला भाजपच्या विचारधारेसोबत लढतानाच त्यांचे नेटवर्क व आर्थिक ताकदीशीही लढावे लागेल. आपले लक्ष्य भाजप असायला हवे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार नव्हे. ईडी, सीबीआयने कितीही त्रास दिला तरी काही बिघडत नाही. जो तुरुंगात गेला तो हिरो बनला, असा इतिहास आहे. लोकांना दमन आवडत नाही. त्यामुळे चिंता न करता काँग्रेस बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केले. काँग्रेसने आपल्याला खूप काही दिले. आता निवडणूक लढायची नाही. काही मागायचे नाही. पक्षाचे कर्ज फेडायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी-फडणवीस हे उत्तर-दक्षिण ध्रुव : गांधी

- भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध उत्तर व दक्षिण धुव्रासारखे आहेत. हे काही आता लपून नाही. मात्र, पक्षाच्या बैठकीत ते एकत्र असतात. एकत्रित निर्णय घेतात, असे सांगून गिरीश गांधी यांनी गडकरी-फडणवीसांमधील वाढत्या दरीवर बोट ठेवले. सोबतच पक्षासाठी त्यांच्या एकीचे उदाहरण देत काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काही बाबी न पटल्यास प्रसार माध्यमांकडे धाव घेण्याऐवजी पक्षाकडे मत नोंदवावे, असा सल्ला दिला. महापालिकेच्या निवडणुकीत गटतट, वाद बाजूला सारा. आपल्या माणसाला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाचा उमेदवार पाडू नका, उलट वॉर्डनिहाय जबाबदारी स्कीकारा, असा सल्लाही गांधी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.

गटबाजी सोडून काम करा- घारड

- प्रदेश काँग्रेसवर अनेकांना संधी मिळाली. अनेक कर्मठ कार्यकर्त्यांची नावे राहून गेली. मात्र, पद असो वा नसो पक्षाचे काम करा. काँग्रेसमध्ये नागपूर शहराला एक वेगळे महत्त्व आहे. गटबाजी बाजूला सारून एकत्र या व महापालिका जिंका, असे आवाहन ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांनी केले.

आधी नेत्यांनी एकत्र बसावे : ओझा

नागपुरात नेत्यांच्या भांडणात काँग्रेसच्या पुढील तीन पिढ्या भुईसपाट झाल्या आहेत. नेते एकत्र बसल्याशिवाय महापालिकेची निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे कुणाचे पाय पकडायचे असतील तर सांगा, आम्ही तेही करू पण आधी नेत्यांनी आपली भूमिका बदलावी, अशी रोखठोक भूमिका रामकिशन ओझा यांनी मांडली.