शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल : पुण्यप्रसुन वाजपेयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:06 IST

भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५७७७ क्युबिक मीटर पाणी मिळत होते. २०१२ मध्ये १५४५ क्युबिक मीटर आणि २०१९ मध्ये १३४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. विकासकामांचे कारण पुढे करून झालेली भरमसाट वृक्षतोड,सिमेंटचे रस्ते, पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्दे‘जल है तो कल है’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५७७७ क्युबिक मीटर पाणी मिळत होते. २०१२ मध्ये १५४५ क्युबिक मीटर आणि २०१९ मध्ये १३४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. विकासकामांचे कारण पुढे करून झालेली भरमसाट वृक्षतोड,सिमेंटचे रस्ते, पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज येथे केले.कॉंग्रेस विचार जनजागृती अभियानाच्यावतीने वनामतीच्या सभागृहात ‘जल है तो कल है’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. अनिस अहमद, महापालिकेचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल गुडधे पाटील उपस्थित होते. वाजपेयी म्हणाले, भारतात ५४३८ मिलियन डॉलरचा पाण्याचा व्यवसाय होतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु कृषीवरच देशात सर्वात कमी काम होते. हरियाणा, राजस्थानात गार्इंच्या चराईसाठी असलेल्या जमिनीवर राजकीय नेत्यांनी ताबा मिळविला आहे. देशात कुठलाही प्रकल्प सुरू होण्यापूवी पर्यावरण मंत्रालय चौकशी करून त्या प्रकल्पामुळे निसर्गाचे नुकसान होते काय याची पाहणी करते. परंतु इंदिरा गांधीनंतर कुणालाच पर्यावरणाची चिंता उरली नाही. २००९ ते २०१४ दरम्यान कॉंग्रेसने १ कोटी २ लाख वृक्ष तोडले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात २०१४ ते २०१९ दरम्यान विकास कामांच्या नावाखाली १ कोटी ९ लाख ७५ हजार ८४४ झाडे तोडली. त्यामुळे पाण्याचे संकट उभे राहणार होते. कार्पोरेट कंपन्याही आपला सीएसआरचा निधी पाणी, वायु प्रदूषणावर खर्च करण्यास तयार नसून त्यांचा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकल्पांसाठी वापरण्यात येत आहे. सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे पिल्लरमुळे पाण्याची पातळी दोन मीटर खाली जाते. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणांबाबत कुणीच काही बोलण्यास तयार नसून जनतेमध्ये जाऊन जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नितीन राऊत म्हणाले, विकासाचे चित्र रंगवित २४ बाय ७ पाणी देण्याचे आश्वासन देऊन आठवड्यातून तीन दिवस पाणी मिळत आहे. कोची धरणाचे काम शासनाने केले नाही. नागपूरची लोकसंख्या ४५ लाख झाल्यास काय करावे याचे नियोजन राज्यकर्त्यांकडे नाही. सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढले असून आधी नोटबंदीमुळे आणि आता पाण्यासाठी रांगा लागत आहेत.प्रास्ताविकातून तानाजी वनवे यांनी नागपुरातील भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, त्यावर मंथन करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असून, विदर्भात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात एव्हरेस्ट शिखर सर करणारे प्रणय बांडेबुचे, रशियन वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मिळविणारे सागर गुर्वे, तबला, म्युझिकमध्ये क्वालालम्पूरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे वंश शुक्ला, हाफीस अन्सारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर