शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:57 IST

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देजीएसआयचे महासंचालक मेश्राम भूजल स्रोत व पाणीसंकटावर राष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारत सरकार १०० स्मार्ट शहर निर्मितीचा प्रकल्प राबवित आहे, मात्र प्रत्येक नागरिकासाठी दररोज लागणारे १५० लिटर पाणी उपलब्ध आहे का, हा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील सरकारांनी पाण्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात होणारे युद्ध हे पाण्यासाठी असेल, अशी चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक एस. एन. मेश्राम यांनी व्यक्त केली.गोंडवाना जिओलॉजिकल सोसायटी (जीएसआय) तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीजी जिओलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात भूजल आणि जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांसमोरील आव्हाने’ या विषयावर धरमपेठ येथील वनामती येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. याच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजोय रॉय, जीजीएसचे अध्यक्ष व परिषदेचे संयोजक डॉ. अंजन चटर्जी, विद्यापीठाच्या जिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. ए.एम. पोफरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डीजी एस.एन. मेश्राम पुढे म्हणाले, पाण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला, हे इतिहासात सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. वर्तमान काळात आपल्या जवळच महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक व तामिळनाडू तसेच भारत व चीन यांच्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सर्वांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी हा सुद्धा शाश्वत विकासाचा भाग आहे. पाणी संकट हे अंदाजाने नाही तर सर्वेक्षणाने मांडण्यात येत आहे. २०५० पर्यंत हे संकट अत्याधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे जलसंवर्धनाचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने आताच या दिशेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. भूजल पातळी खाली घसरत आहे, कावेरी व गोदावरी आदी नद्यांचे पात्र घटत चालले आहे. आपल्यासमोर केवळ पाणीटंचाईचे संकट उभे आहे, असे नाही तर पाण्याच्या प्रदूषणाचेही मोठे संकट उभे ठाकले आहे. जीएसआय सातत्याने यावर सर्वेक्षण करीत असते व यामध्ये प्रदूषणाच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आपण स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासाच्या गोष्टी करतो, मात्र सर्वांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळावे, हा सुद्धा या संकल्पनेचा भाग ठरावा, अशी भावना मेश्राम यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, हवा, पाणी व नैसर्गिक संपदेमध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप हे संकटाचे कारण आहे. हे आव्हान थोपविण्यासाठी आर्थिक धोरण राबविण्याची गरज डॉ. काणे यांनी व्यक्त केली. आयोजन सचिव ए.एम. वराडे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे भूषण लामसोंगे यांनी आभार मानले. दोन दिवसीय परिषदेमध्ये पाणी संवर्धनाशी संबंधित विविध विषयावर तज्ज्ञांद्वारे विचार मांडण्यात येणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपात