शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:57 IST

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देजीएसआयचे महासंचालक मेश्राम भूजल स्रोत व पाणीसंकटावर राष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारत सरकार १०० स्मार्ट शहर निर्मितीचा प्रकल्प राबवित आहे, मात्र प्रत्येक नागरिकासाठी दररोज लागणारे १५० लिटर पाणी उपलब्ध आहे का, हा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील सरकारांनी पाण्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात होणारे युद्ध हे पाण्यासाठी असेल, अशी चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक एस. एन. मेश्राम यांनी व्यक्त केली.गोंडवाना जिओलॉजिकल सोसायटी (जीएसआय) तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीजी जिओलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात भूजल आणि जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांसमोरील आव्हाने’ या विषयावर धरमपेठ येथील वनामती येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. याच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजोय रॉय, जीजीएसचे अध्यक्ष व परिषदेचे संयोजक डॉ. अंजन चटर्जी, विद्यापीठाच्या जिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. ए.एम. पोफरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डीजी एस.एन. मेश्राम पुढे म्हणाले, पाण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला, हे इतिहासात सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. वर्तमान काळात आपल्या जवळच महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक व तामिळनाडू तसेच भारत व चीन यांच्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सर्वांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी हा सुद्धा शाश्वत विकासाचा भाग आहे. पाणी संकट हे अंदाजाने नाही तर सर्वेक्षणाने मांडण्यात येत आहे. २०५० पर्यंत हे संकट अत्याधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे जलसंवर्धनाचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने आताच या दिशेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. भूजल पातळी खाली घसरत आहे, कावेरी व गोदावरी आदी नद्यांचे पात्र घटत चालले आहे. आपल्यासमोर केवळ पाणीटंचाईचे संकट उभे आहे, असे नाही तर पाण्याच्या प्रदूषणाचेही मोठे संकट उभे ठाकले आहे. जीएसआय सातत्याने यावर सर्वेक्षण करीत असते व यामध्ये प्रदूषणाच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आपण स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासाच्या गोष्टी करतो, मात्र सर्वांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळावे, हा सुद्धा या संकल्पनेचा भाग ठरावा, अशी भावना मेश्राम यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, हवा, पाणी व नैसर्गिक संपदेमध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप हे संकटाचे कारण आहे. हे आव्हान थोपविण्यासाठी आर्थिक धोरण राबविण्याची गरज डॉ. काणे यांनी व्यक्त केली. आयोजन सचिव ए.एम. वराडे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे भूषण लामसोंगे यांनी आभार मानले. दोन दिवसीय परिषदेमध्ये पाणी संवर्धनाशी संबंधित विविध विषयावर तज्ज्ञांद्वारे विचार मांडण्यात येणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपात