शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

लॉकडाऊनमध्ये मृतांवर व्हावेत रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार; अनेक जण राहतात एकटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:53 IST

कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

ठळक मुद्देआईला गमावलेल्या बंगळुरूतील मुलीची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास प्रशासनाने त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.दीपशिखा यांच्या वयोवृद्ध आई बाणी चक्रवर्ती या वाडी येथे एकट्या राहत होत्या. त्या ७३ वर्षांच्या होत्या. २ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊन लागू असल्यामुळे दीपशिखा व त्यांचे मुंबई येथे राहत असलेले भाऊ अनेक प्रयत्न करूनही वाडी येथे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे दीपशिखा यांनी नागपूर येथे उच्च पदावर कार्यरत मैत्रिणीला फोन लावून आईवर शक्य त्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून घेतले. अशी वेळ कुणावरही येऊ शकते आणि जाग्यावरून सर्व व्यवस्था करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा घटना घडल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, असे मत दीपशिखा यांनी व्यक्त केले.दीपशिखा यांचे वडील आयुधनिर्माणी अंबाझरी येथे अधिकारी होते. दरम्यान, त्यांनी वाडी येथे घर बांधले. त्यांच्या मृत्यूनंतर दीपशिखा व त्यांच्या भावाने आईला सोबत नेले. परंतु, आईचा वाडी येथेच राहण्याचा आग्रह होता. त्यामुळे त्या वाडी येथील घरी एकट्या राहत होत्या. त्यांच्या सेवेसाठी एक केअरटेकर व दोन नर्सेस ठेवल्या होत्या. दरम्यान, २ एप्रिल रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्यासारखे अनेक जण मुले व नातेवाईकांपासून दूर विविध ठिकाणी एकटे राहतात. लॉकडाऊनदरम्यान, अशी घटना घडल्यास कुटुंबीय व नातेवाईकांना वेळेवर संबंधित ठिकाणी पोहचणे अशक्य होऊ शकते. कोरोनामुळे शेजारीही पुढे येण्यास घाबरू शकतात. अशावेळी अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. मृतदेहाची विटंबना होणार नाही याची काळजी घेऊन आणि रीतिरिवाज पाळून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली गेली पाहिजे, असे दीपशिखा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Deathमृत्यू