शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:37 IST

पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे.

ठळक मुद्देहोलसेलमधून साखर, खाद्यतेल, आटा यांची आवक घटली

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे. माल वाहतूक बंद असल्याने जिल्हा वा राज्याबाहेरून तसेच होलसेल मार्केटमधून या वस्तूंची आवक बंद असल्याने पुढे या वस्तूंची विक्री करणे शक्य होणार नाही. याकरिता शासनाने मदत करून आवश्यक वस्तूंची माल वाहतूक खुली करण्याची मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, लॉकडाऊन आणि कलम १४४ चे पालन करीत नागपुरातील सर्वच किराणा दुकानदारांनी वाजवी किमतीत जीवनाश्यक वस्तूंची विक्री केली आणि साठा असेपर्यंत करणार आहेत. बैठकांमध्ये जिल्हाधिकारी किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. साठा असेपर्यंत वस्तूंची विक्री करूच, अन्यथा दुकाने बंद करावी लागतील. लोकांकडून अनावश्यक मागणी वाढली आहे. अनेकांनी दोन-दोन महिन्याच्या किराणा मालाची खरेदी केली आहे. त्यामुळे गरजूंना विक्रीसाठी साठा कमी पडत आहेत. देशात जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, पण बहुतांश ठिकाणी माल वाहतूक थांबल्याने किरकोळ किराणा दुकानात वस्तू पोहोचत नाहीत. याकरिता शासनाने असोसिएशनला मदत करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.असोसिएशनचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, किराणा दुकानांमध्ये सर्व वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही, याची हमी दुकानदार देत आहेत. होलसेलमधून माल मागविण्यात येत आहे. पण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला माल आम्हाला पाठवत आहेत. माल वाहतूक बंद असल्याने वस्तू शहरात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची माल वाहतूक सुरू ठेवावी.इतवारी तेल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर म्हणाले, गुजरात आणि अन्य राज्यांतून शेंगदाणा आणि सोयाबीन कच्च्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्यतेलाचा पॅकिंग कारखाना बंद केला आहे. आमचे स्वाद ब्रॅण्ड तेल साठा असेपर्यंत विकले. पण आता पॅकिंग बंद असल्याने तेलाची विक्री शक्य नाही. शासनाने पासेसची व्यवस्था करून आवश्यक माल वाहतूक खुली करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीत केली आहे. याकरिता जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत. कच्चा माल पोहोचल्यास पॅकिंग करून खाद्यतेल बाजारात उपलब्ध करून देऊ. कमतरता भासू देणार नाही.गिन्नी अ‍ॅग्रोचे संचालक गोविंद मंत्री म्हणाले, कणीक, आटा, मैदा गिन्नी ब्रॅण्ड नावाखाली बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुठलीही कमतरता पडू देणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. युनिटमध्ये अर्धेच कर्मचारी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे गहू ओला झाला आहे. त्यामुळे खरेदी थांबली आहे. पण उपलब्ध कच्च्या मालापासून फिनिश माल तयार करण्यात येत आहे. लोकांची मागणी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर