शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:55 IST

नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागात संविधान दिवस साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानामुळेच नागरिकांना मूलभूत अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात संविधान दिवसानिमित्त ‘माध्यम स्वातंत्र्य व भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.जनसंवाद विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान राज्यघटनेच्या प्रास्ताविका फलकाचेदेखील अनावरण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. मोईज हक, डॉ. धर्मेश धवनकर, स्निग्धा खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते. शासन व्यवस्थेला संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हे प्रसार माध्यमांचे कर्तव्य आहे. माध्यमांच्या वृत्तांच्या संदर्भांमुळे काही वर्षांपूर्वी वंचित आदिवासी घटकातील ३० हजार नागरिकांना बीपीएल कार्ड मिळाले होते. ज्या देशातील प्रसारमाध्यमे जागृत असतात तेथील संविधानासोबत कुठलीही छेडछाड होऊ शकत नाही. मात्र, ज्या देशातील प्रसार माध्यमांनी शरणागती पत्करली, तेथील संविधान बदलण्याचे प्रयत्न झाले, असे अ‍ॅड.मिर्झा यांनी सांगितले. डॉ. मोईज हक यांनी प्रास्ताविक केले. सर्व जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांना एका सूत्रात बांधण्याचे काम देशाचे संविधान करते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मेघा रोकडेने कार्यक्रमाचे संचालन केले. मनोहर शेंद्रे यांनी अतिथींचे स्वागत केले. तुषार धारकरने आभार मानले. दिशा करेशिया, ऐश्वर्या मेश्राम, अमेय ताकसांडे, विनय निमगडे, वैशिष्ट मांडवगडे, अमर अणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनMediaमाध्यमे