शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास

By admin | Updated: December 14, 2015 03:15 IST

आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही,

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत पास देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने कार्यरत शासकीय आदिवासी वसतिगृहात सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ५५,९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना एस.टी. बसचा पास देण्याचा शासनाचा सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून विविध उपाययोजना राज्यातील शेती व शेतकरी यांना चांगले दिवस यावेत यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कृषी, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, असलम शेख, अब्दुल सत्तार, अमित झनक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नेमल्या आहेत. याखेरीज शासनाने जलयुक्त शिवार, शेततळी, युरिया खताच्या किमती वाढू न देता मर्यादित ठेवणे, १४ जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात पिशवीमागे १०० रुपये व प्रति किलोमागे २५० रुपये कमी करणे, एक लाख हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के अनुदानाने फळ झाड लागवड, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, दोन लाख रुपयांचे संरक्षण देणारा अपघात विमा, शेती कर्जाचे पुनर्गठन, व्याज माफी, सघन सिंचन, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप, शेततळी इत्यादी अनेक उपायायेजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास कृषिमंत्री खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)