शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास

By admin | Updated: December 14, 2015 03:15 IST

आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही,

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत पास देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने कार्यरत शासकीय आदिवासी वसतिगृहात सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ५५,९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना एस.टी. बसचा पास देण्याचा शासनाचा सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून विविध उपाययोजना राज्यातील शेती व शेतकरी यांना चांगले दिवस यावेत यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कृषी, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, असलम शेख, अब्दुल सत्तार, अमित झनक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नेमल्या आहेत. याखेरीज शासनाने जलयुक्त शिवार, शेततळी, युरिया खताच्या किमती वाढू न देता मर्यादित ठेवणे, १४ जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात पिशवीमागे १०० रुपये व प्रति किलोमागे २५० रुपये कमी करणे, एक लाख हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के अनुदानाने फळ झाड लागवड, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, दोन लाख रुपयांचे संरक्षण देणारा अपघात विमा, शेती कर्जाचे पुनर्गठन, व्याज माफी, सघन सिंचन, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप, शेततळी इत्यादी अनेक उपायायेजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास कृषिमंत्री खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)