शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

त्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास

By admin | Updated: December 14, 2015 03:15 IST

आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही,

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत पास देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य वैभव पिचड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री सावरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या वतीने कार्यरत शासकीय आदिवासी वसतिगृहात सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ५५,९९८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना एस.टी. बसचा पास देण्याचा शासनाचा सकारात्मक विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून विविध उपाययोजना राज्यातील शेती व शेतकरी यांना चांगले दिवस यावेत यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कृषी, मदत व पुनर्वसन कार्य मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य वीरेंद्र जगताप, अमिन पटेल, असलम शेख, अब्दुल सत्तार, अमित झनक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समित्या नेमल्या आहेत. याखेरीज शासनाने जलयुक्त शिवार, शेततळी, युरिया खताच्या किमती वाढू न देता मर्यादित ठेवणे, १४ जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात पिशवीमागे १०० रुपये व प्रति किलोमागे २५० रुपये कमी करणे, एक लाख हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के अनुदानाने फळ झाड लागवड, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी, दोन लाख रुपयांचे संरक्षण देणारा अपघात विमा, शेती कर्जाचे पुनर्गठन, व्याज माफी, सघन सिंचन, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप, शेततळी इत्यादी अनेक उपायायेजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास कृषिमंत्री खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)