शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

नागपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे चार हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 20:08 IST

नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे.

ठळक मुद्देशहरातही ८८७ रुग्णांची नोंद : जिल्हाभर यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत २ मार्चपासून उपचार मोहीम राबविली जाणार आहे. असे असले तरी सर्व जिल्हाभर हत्तीपाय दुरीकरणासाठी यंत्रणा मात्र नाही.हत्तीपाय आणि हायड्रोसिल या दोन्ही आजारांचा जवळचा संबंध आहे. नागपूर जिल्ह्यात ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची रुग्णांची नोंद असून, या निम्मे म्हणजे २,१९१ हायड्रोसिल रुग्णांची नोंद झाली आहे तर नव्या २१ रुग्णांच्या रक्तांमध्ये हे जंतू आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ३८ प्रभागांमध्येही ही रुग्णसंख्या अधिक आहे. शहरात ८८७ हत्तीपाय रुग्ण असून, हायड्रोसिलचे ५० रुग्ण आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड, विमानतळाचा काही भाग, कामठी, भिवापूर, सावनेर, कुही मांढळ, रामटेक या तालुक्यामध्ये हत्तीपायाचे रुग्ण अधिक आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेल्या यंत्रणेकडून फक्त या भागातच हत्तीपाय दुरीकरणाची मोहीम राबविली जाते. अन्य ठिकाणी रुग्ण कमी असल्याची नोंद असल्याने उर्वारित भागात यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे या भागातील रुग्ण स्वत:हून तपासणीला आले किंवा आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत आढळले तरच या रुग्णांची नोंद होते, ही वस्तुस्थिती आहे.केंद्राच्या सूचनेनुसार, यंदा २ मार्च ते १२ मार्च या काळात हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे; नंतरचे पुढील पाच दिवस मॉकअप राऊंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत निवडलेल्या गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके, अति गंभीर रुग्ण वगळता गोळ्यांची मात्रा खाऊ घातली जाणार आहे.हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू होत असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्यासमक्ष गोळ्या देणार आहेत. या औषधोपचारानंतर किरकोळ गुंतागुंत आढळली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम नसतात. तरीही अशी गुंतागुंत आढळल्यास आरोग्य संस्थेच्या पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.डॉ. राहुल गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी, नागपूरजंतु रात्री असतात सक्रियहत्तीपायाचे जंतू रात्रीच अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रक्तनमुने रात्रीच घेतले जातात. एखाद्या रुग्णाला हत्तीपायाचा आजार जडल्यास रुग्णाच्या शरीरात १५ वर्षांपर्यंत जंतु सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे हत्तीपायाचा आजार झाल्याचे वेळीच लक्षात येत नाही. मात्र थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे अशी लक्षणे रुग्णामध्ये वारंवार दिसायला लागतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर