शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

नागपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे चार हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 20:08 IST

नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे.

ठळक मुद्देशहरातही ८८७ रुग्णांची नोंद : जिल्हाभर यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत २ मार्चपासून उपचार मोहीम राबविली जाणार आहे. असे असले तरी सर्व जिल्हाभर हत्तीपाय दुरीकरणासाठी यंत्रणा मात्र नाही.हत्तीपाय आणि हायड्रोसिल या दोन्ही आजारांचा जवळचा संबंध आहे. नागपूर जिल्ह्यात ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची रुग्णांची नोंद असून, या निम्मे म्हणजे २,१९१ हायड्रोसिल रुग्णांची नोंद झाली आहे तर नव्या २१ रुग्णांच्या रक्तांमध्ये हे जंतू आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ३८ प्रभागांमध्येही ही रुग्णसंख्या अधिक आहे. शहरात ८८७ हत्तीपाय रुग्ण असून, हायड्रोसिलचे ५० रुग्ण आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड, विमानतळाचा काही भाग, कामठी, भिवापूर, सावनेर, कुही मांढळ, रामटेक या तालुक्यामध्ये हत्तीपायाचे रुग्ण अधिक आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेल्या यंत्रणेकडून फक्त या भागातच हत्तीपाय दुरीकरणाची मोहीम राबविली जाते. अन्य ठिकाणी रुग्ण कमी असल्याची नोंद असल्याने उर्वारित भागात यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे या भागातील रुग्ण स्वत:हून तपासणीला आले किंवा आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत आढळले तरच या रुग्णांची नोंद होते, ही वस्तुस्थिती आहे.केंद्राच्या सूचनेनुसार, यंदा २ मार्च ते १२ मार्च या काळात हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे; नंतरचे पुढील पाच दिवस मॉकअप राऊंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत निवडलेल्या गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके, अति गंभीर रुग्ण वगळता गोळ्यांची मात्रा खाऊ घातली जाणार आहे.हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू होत असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्यासमक्ष गोळ्या देणार आहेत. या औषधोपचारानंतर किरकोळ गुंतागुंत आढळली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम नसतात. तरीही अशी गुंतागुंत आढळल्यास आरोग्य संस्थेच्या पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.डॉ. राहुल गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी, नागपूरजंतु रात्री असतात सक्रियहत्तीपायाचे जंतू रात्रीच अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रक्तनमुने रात्रीच घेतले जातात. एखाद्या रुग्णाला हत्तीपायाचा आजार जडल्यास रुग्णाच्या शरीरात १५ वर्षांपर्यंत जंतु सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे हत्तीपायाचा आजार झाल्याचे वेळीच लक्षात येत नाही. मात्र थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे अशी लक्षणे रुग्णामध्ये वारंवार दिसायला लागतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर