शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

ठळक मुद्देहायकोर्ट : राज्य सरकारचे अपील फेटाळलेनागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.राजेंद्र गुलाब बोलधन (५३), जिरालाल नर्मदाप्रसाद दुबे (५५), अरविंद प्रल्हाद सराफ (५२) व वसंत कवडू आडे (६६) अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आडे पोलीस निरीक्षक, सराफ पोलीस उपनिरीक्षक, दुबे हेड कॉन्स्टेबल तर, बोलधन कॉन्स्टेबल होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.२८ आॅक्टोबर २००३ रोजी गणेशपेठ पोलिसांना बजेरियामधील वाजपेयी मंदिराजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बोलधन व दुबे यांनी मनोज वर्मा यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. राजेश यादव यांच्या तक्रारीवरून वर्मा यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४ व ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. दरम्यान, रात्री ८.१५ च्या सुमारास वर्मा यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वर्मा यांचे भाऊ सुजित यांच्या तक्रारीनंतर आवश्यक चौकशी करून पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस