शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘त्या’ चार अनाथ मुलींचा फुलला संसार, श्रद्धानंद अनाथाश्रमात आयोजन

By दयानंद पाईकराव | Updated: July 11, 2024 21:19 IST

विविध संस्था, समाजसेवकांनी घेतला पुढाकार

नागपूर: अनाथ म्हटलं की आपलं जवळच असं कुणीच नसतं. त्यात लग्न समारंभ म्हटला की कुटुंबप्रमुखाला सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परंतु श्रद्धानंदपेठेतील श्री श्रद्धानंद अनाथाश्रमात गुरुवारी पार पडलेला विवाह सोहळा याला अपवाद ठरला. अनाथाश्रमातील चार अनाथ मुलींच्या लग्नासाठी विविध संस्था, संघटना, समाजसेवक एकत्र आले. त्यांनी सोहळ्याची जय्यत तयारी केली अन् ‘त्या’ अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाला.

श्रद्धानंदपेठ येथील श्री श्रद्धानंद अनाथालयात गुरुवारी ११ जुलैला सकाळी ११.१० वाजता अनाथालयाचे अध्यक्ष गोपाळराव बुटी, उपाध्यक्ष मिरा खडक्कार, सचिव डॉ. निशा बुटी, बालाजी बुटी, सहसचिव गीतांजली बुटी, कोषाध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी या विवाह सोहळ््याचे आयोजन केले. या विवाह सोहळ््यात शहराच्या विविध भागातील संस्थांनी सहभागी होऊन हळद, मेहंदी आणि जलग्रहण विधीचे आयोजन केले. यात गणेश टेकडी सेवा समितीने मोलाचे सहकार्य केले.

विवाह सोहळ्याला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशिर्वाद दिले. तर नरेंद्र जिचकार, प्रशांत दुमुके, सचिन पुरोहित, डॉ. अभिजीत देव यांनी चारही मुलींचे कन्यादान केले. यावेळी सुमन मिश्रा, शशी तिवारी, कल्पना शुक्ला, प्रियल पांडे, लतिका त्रिपाठी, ममता तिवारी, ममता दुबे, किरण दुबे, दीपा पाचोरी, कीर्ती झा, रुची बोस, शिवानी सिंग आणि पिंकी दुबे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाल्याबद्दल विवाह सोहळ्याला उपस्थितांनी आनंद व्यक्त करून त्यांचा संसार सुखाचा होवो, असे आशिर्वाद दिले.

टॅग्स :nagpurनागपूर