शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी मिळणार चार महिन्यांचा अवधी

By यदू जोशी | Updated: July 6, 2018 02:17 IST

गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना १२० दिवसांपर्यंत आरोपीची कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नागपूर : गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना १२० दिवसांपर्यंत आरोपीची कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी दंडप्रक्रिया संहितेत (सीआरपीसी) आवश्यक दुरुस्त्या करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे समजते.सध्याच्या तरतुदीनुसार ज्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंड, जन्मठेप किंवा किमान दहा वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा आहे. अशा गुन्ह्यात अटक आरोपीची दंडाधिकारी जास्तीत जास्त ९० दिवस कोठडीत रवानगी करू शकत होते. मात्र प्रस्तावित दुरुस्तीनुसार या निर्धारित काळात तपास पूर्ण झाला नाही तर सरकारी वकिलांनी अहवाल दिल्यास दंडाधिकारी तपासाच्या प्रगतीचा आढावा घेऊन, अशा आरोपींची कोठडी १२० दिवसांपर्यंत वाढवू शकतील. या दुरुस्तीनंतरही कोणत्याही परिस्थितीत आरोपीला १५ दिवसापेक्षा जास्त पोलीस कोठडी न देण्याची तरतूद कायम राहील.खावटीच्या अर्जासाठी महिलांना दिलासापत्नीला आतापर्यंत खावटीसाठीचा अर्ज तिचा पती राहतो किंवा तो पत्नीसोबत शेवटचे राहत होता त्या ठिकाणच्या न्यायालयात करता येत असे. आता पतीचे आईवडील ज्या ठिकाणी राहतात तेथे वा त्याच्या जवळच्या न्यायालयातदेखील सदर अर्ज करता येणार आहे. खावटीसाठी अर्ज केलेली पत्नी, मुलगा यांना सरतपासणीसाठी (स्वत:ची बाजू मांडण्यासाठी) स्वत: हजर राहावे लागते. यापुढे खावटी मागणाºया व्यक्तीला स्वत: हजर राहण्याची गरज नसेल, तिला वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करता येईल. नोटीस ही न्यायालयाकडून संबंधित पोलीस ठाण्यास पाठविली जाते आणि त्या पोलीस ठाण्याकडून मग ती संबंधितांना बजावली जाते. न्यायालय संबंधितांना ई-मेल आदीद्वारेही नोटीस पाठवू शकेल.चोरीच्या संशयावरून किंवा शंकास्पद अवस्थेत सापडलेल्या जप्त मालापैकी नाशवंत अशा (ज्यांचा नाश नजीकच्या काळात होऊ शकतो) वस्तू ज्यांची किंमत ५०० रुपयांपर्यंत आहे त्यांचाच लिलाव करण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखास होते. आता ज्या नाशवंत वस्तूंची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे त्यांचाही लिलाव करण्याचे अधिकार त्यांना असतील.- एखाद्या विशिष्ट गुन्ह्यात विशेष सरकारी वकील नेमण्याचे अधिकार हे केंद्र वा राज्य सरकारला आहेत. आता जिल्हा दंडाधिकारी हे अशा वकिलाची नियुक्ती संबंधित शहर पोलीस आयुक्त वा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीवरून करतील.- आरोपीवर न्यायालयात आरोप निश्चित करताना तो स्वत: हजर राहणे अनिवार्य असते. कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला पोलीस न्यायालयात हजर करतात. मात्र, आता यापुढे आरोपी कोठडीत असेल तर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आदी) त्याची उपस्थिती ग्राह्य धरली जाईल.- असे सर्व बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यासाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात सादर करावयाच्या विधेयकाच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दहा हजारापर्यंत दंडाच्या गुन्ह्यांचा निपटारा समन्सनेएक हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायाधीश हे आरोपीला समन्स पाठवायचे आणि त्याने स्वत: वा वकिलामार्फत गुन्हा कबूल केला तर दंड भरता येतो. कलम २०६ मध्ये ही तरतूद आहे. एक हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाची तरतूद असलेले खटले मात्र न्यायालयात चालतात. आता १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असलेल्या प्रकरणांतही न्यायाधीश हे आरोपीला समन्स पाठवू शकतील आणि आरोपी हा गुन्हा कबूल करून दंड भरू शकेल.

टॅग्स :nagpurनागपूर