शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

नागपुरात विना विमा चार लाखावर दुचाकी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:26 IST

Four lakh uninsured two-wheelers on the road, nagpur news शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे शहरात १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने : दुचाकींची संख्या १४ लाखावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

शहर आरटीओ कार्यालयांतर्गत सर्व प्रकारची वाहने मिळून १३ लाख ५४ हजार १७४ वाहने आहेत. तर पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ४ लाख ४४ हजार ६५७ अशी एकूण १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने आहेत. मात्र ही वाहने आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेपासूनची आहेत. यामुळे यातील किती वाहने मोडकळीस निघाली असतील आणि किती वाहने रस्त्यावर असतील, याची माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, एकूण वाहनाच्या तुलनेत सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ११ लाख ३ हजार तर, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ३ लाख ४४ हजार ३९६ दुचाकी आहेत. दोन्ही आरटीओ कार्यालये मिळून कारची संख्या १ लाख ६४ हजार ९८५ आहेत. ट्रकची संख्या १६ हजार ९८६, स्कूल बसची संख्या १ हजार ८७३ आहे. तज्ज्ञानुसार, बहुसंख्य चारचाकी वाहनांचे मालक नियमित विमा काढतात. परंतु दुचाकी वाहनांचा विमा काढण्यास अनेक चालक दुर्लक्ष करतात. वाहनचालक विमा काढतात किंवा नाही यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचा वॉच असतो. मात्र लाखो वाहनांची तपासणी करणे त्यांनाही मोठ्या अडचणीचे असते. याचा फायदा घेत, वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करतात. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर आहेत. परंतु दुचाकी चालक यासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. चार लाखापेक्षा अधिक दुचाकीचा विमा नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी यापेक्षा जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमा नसल्याचे धोके

एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. यासोबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर दोषी आढळल्यास शिक्षा होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धोके जास्त आहे. वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. वाहतूक विभागाकडून अशा वाहनांवर वारंवार कारवाई करण्यात येते. वाहन तपासणीत विमाही पाहिला जातो.

- सारंग अव्हाड, उपायुक्त पोलीस (वाहतूक)

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर