शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विना विमा चार लाखावर दुचाकी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:26 IST

Four lakh uninsured two-wheelers on the road, nagpur news शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे शहरात १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने : दुचाकींची संख्या १४ लाखावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात १४ लाख ७४ हजार ३९९ दुचाकींची संख्या आहे. यातील जवळपास चार लाखावर अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. ज्या वाहनचालकांनी बँकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येतो, मात्र बँकेचे दुचाकीवरील कर्ज संपताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

शहर आरटीओ कार्यालयांतर्गत सर्व प्रकारची वाहने मिळून १३ लाख ५४ हजार १७४ वाहने आहेत. तर पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ४ लाख ४४ हजार ६५७ अशी एकूण १७ लाख ९८ हजार ८३१ वाहने आहेत. मात्र ही वाहने आरटीओ कार्यालयाच्या स्थापनेपासूनची आहेत. यामुळे यातील किती वाहने मोडकळीस निघाली असतील आणि किती वाहने रस्त्यावर असतील, याची माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, एकूण वाहनाच्या तुलनेत सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ११ लाख ३ हजार तर, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत ३ लाख ४४ हजार ३९६ दुचाकी आहेत. दोन्ही आरटीओ कार्यालये मिळून कारची संख्या १ लाख ६४ हजार ९८५ आहेत. ट्रकची संख्या १६ हजार ९८६, स्कूल बसची संख्या १ हजार ८७३ आहे. तज्ज्ञानुसार, बहुसंख्य चारचाकी वाहनांचे मालक नियमित विमा काढतात. परंतु दुचाकी वाहनांचा विमा काढण्यास अनेक चालक दुर्लक्ष करतात. वाहनचालक विमा काढतात किंवा नाही यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचा वॉच असतो. मात्र लाखो वाहनांची तपासणी करणे त्यांनाही मोठ्या अडचणीचे असते. याचा फायदा घेत, वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करतात. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर आहेत. परंतु दुचाकी चालक यासंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. चार लाखापेक्षा अधिक दुचाकीचा विमा नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी यापेक्षा जास्त संख्या असण्याची शक्यता आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमा नसल्याचे धोके

एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. यासोबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर दोषी आढळल्यास शिक्षा होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धोके जास्त आहे. वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. वाहतूक विभागाकडून अशा वाहनांवर वारंवार कारवाई करण्यात येते. वाहन तपासणीत विमाही पाहिला जातो.

- सारंग अव्हाड, उपायुक्त पोलीस (वाहतूक)

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर