शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST

भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकाचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय : तपास यंत्रणांमध्ये खळबळ

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येत भारतात प्रवेश केला असून ते विविध शहरात वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती विशेष शाखेला दोन महिन्यांपूर्वी मिळाली. या महितीच्या आधारे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे सहायक निरीक्षक ए. एस. फर्नांडिस, ज्ञानेश्वर उराडे, हवलदार श्यामकुमार कुलमते, हरीदास, दुर्याेधन रमेश, रविशंकर, संतोष, सलीम, सुनिता. ज्ञानेश्वर भोगे, कमलाकर भंगाळे आदींनी अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी करून गिट्टीखदान, सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने राहणाºया चौघांच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे रॉकी विमल बरूवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरूवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरूवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरूवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरूवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) यांना २३ आॅगस्टच्या सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची वरिष्ठ पोलीस सूत्रांची माहिती आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितलेल्या माहितीनुसार, उपरोक्त चौघांपैकी एकाचे संबंध बांगलादेशमधील ‘अन्सारउल बांगलादेश टीम (एबीटी)’ शी असल्याचा संशय आहे. तशी काही स्फोटक माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले असून, या चौघांना अटक करून गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले आहे. एक दोन दिवसात या प्रकरणात महत्त्वपूर्ण तेवढीच स्फोटक माहिती उघड होण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे.एबीटी भारताच्या उण्यावरएबीटी ही दहशतवादी संघटना भारताच्या उण्यावर असून ती नेहमी भारतात दहशतवादी घुसवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतात बनावट चलन पाठविणे, घातपात घडविण्याचे कट रचणे यातही एबीटीचा सहभाग असल्याचे अनेकदा उघड झाल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ही माहिती उघड झाल्याने तपास यंत्रणांनीही आता समांतर मात्र स्वतंत्र चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाBangladeshबांगलादेश