शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

नागपुरात चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST

भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकाचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय : तपास यंत्रणांमध्ये खळबळ

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येत भारतात प्रवेश केला असून ते विविध शहरात वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती विशेष शाखेला दोन महिन्यांपूर्वी मिळाली. या महितीच्या आधारे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे सहायक निरीक्षक ए. एस. फर्नांडिस, ज्ञानेश्वर उराडे, हवलदार श्यामकुमार कुलमते, हरीदास, दुर्याेधन रमेश, रविशंकर, संतोष, सलीम, सुनिता. ज्ञानेश्वर भोगे, कमलाकर भंगाळे आदींनी अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी करून गिट्टीखदान, सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने राहणाºया चौघांच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे रॉकी विमल बरूवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरूवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरूवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरूवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरूवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) यांना २३ आॅगस्टच्या सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची वरिष्ठ पोलीस सूत्रांची माहिती आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगितलेल्या माहितीनुसार, उपरोक्त चौघांपैकी एकाचे संबंध बांगलादेशमधील ‘अन्सारउल बांगलादेश टीम (एबीटी)’ शी असल्याचा संशय आहे. तशी काही स्फोटक माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले असून, या चौघांना अटक करून गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले आहे. एक दोन दिवसात या प्रकरणात महत्त्वपूर्ण तेवढीच स्फोटक माहिती उघड होण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे.एबीटी भारताच्या उण्यावरएबीटी ही दहशतवादी संघटना भारताच्या उण्यावर असून ती नेहमी भारतात दहशतवादी घुसवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतात बनावट चलन पाठविणे, घातपात घडविण्याचे कट रचणे यातही एबीटीचा सहभाग असल्याचे अनेकदा उघड झाल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ही माहिती उघड झाल्याने तपास यंत्रणांनीही आता समांतर मात्र स्वतंत्र चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाBangladeshबांगलादेश