शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

नागपुरात  साडेचार लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:15 IST

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१७ महिन्यांतील आकडेवारी : रस्ते अपघातांमध्ये ३४९ जणांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किती कारवाई झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१८ ते २० मे २०१९ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ४ लाख ५२ हजार ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १० कोटी ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.१७ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात ३२५ अपघात झाले व यात ३४९ नागरिकांचा बळी गेला. तर आऊटर रिंग रोडवर १७५ अपघातांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला.सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा ?माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५२ हजार ३८ वाहनांची तपासणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व वाहनचालकांवर कारवाई झाली. तपासणी झालेल्या सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा काय आढळून आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गुन्हा                                कारवाई                  दंड (रुपयांमध्ये)हेल्मेट न घालणे                 ७४,०७४                   २,८६,०९,४००परवाना नसणे                    १६,६५५                   ८१,८९,५००मोबाईलवर बोलणे              १५,१२०                    २३,७४,०००दारु पिऊन वाहन चालविणे २५,४५५                  २,५५,१२,८००वाहतूक सिग्नल तोडणे         ३४,८९४                   ५७,३२,७००हेल्मेट न घालणे ७४ हजार जणांना भोवलेहेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी ७४ हजार ७४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ८६ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या १५ हजार १२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना २३ लाख ७४ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ६५५ महाभागांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ८१ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तळीरामांकडून अडीच कोटी वसूलमद्यप्राशन करून वाहने चालविताना २५ हजार ४५५ वाहनचालक वाहतूक विभागाच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ५५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या ३४ हजार ८९४ नागरिकांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ५७ लाख ३२ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता