शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरात  साडेचार लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:15 IST

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१७ महिन्यांतील आकडेवारी : रस्ते अपघातांमध्ये ३४९ जणांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किती कारवाई झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१८ ते २० मे २०१९ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ४ लाख ५२ हजार ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १० कोटी ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.१७ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात ३२५ अपघात झाले व यात ३४९ नागरिकांचा बळी गेला. तर आऊटर रिंग रोडवर १७५ अपघातांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला.सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा ?माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५२ हजार ३८ वाहनांची तपासणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व वाहनचालकांवर कारवाई झाली. तपासणी झालेल्या सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा काय आढळून आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गुन्हा                                कारवाई                  दंड (रुपयांमध्ये)हेल्मेट न घालणे                 ७४,०७४                   २,८६,०९,४००परवाना नसणे                    १६,६५५                   ८१,८९,५००मोबाईलवर बोलणे              १५,१२०                    २३,७४,०००दारु पिऊन वाहन चालविणे २५,४५५                  २,५५,१२,८००वाहतूक सिग्नल तोडणे         ३४,८९४                   ५७,३२,७००हेल्मेट न घालणे ७४ हजार जणांना भोवलेहेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी ७४ हजार ७४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ८६ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या १५ हजार १२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना २३ लाख ७४ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ६५५ महाभागांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ८१ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तळीरामांकडून अडीच कोटी वसूलमद्यप्राशन करून वाहने चालविताना २५ हजार ४५५ वाहनचालक वाहतूक विभागाच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ५५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या ३४ हजार ८९४ नागरिकांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ५७ लाख ३२ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता