शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

शिवसेना कार्यकर्ता धनेश गुप्ता हत्याकांडात चार आरोपी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 12:50 IST

दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेवर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर या आरोपींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : शिक्षेवर येत्या शनिवारी सुनावणी

नागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी देवलापार येथील शिवसेना कार्यकर्ता धनेश बंसीधर गुप्ता (२५) यांच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवले तर, नऊ आरोपींना निर्दोष सोडले. न्या. सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेवर येत्या शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर या आरोपींना कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल.

खुनासह इतर संबंधित गुन्ह्यांत दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुफानसिंग इंदल यादव, सुनील गोपाल यादव, मलखानसिंग अश्रफीलाल यादव व प्रेमलाल अश्रफीलाल यादव यांचा समावेश आहे. वीरेंद्र लखन यादव, वासुदेव धासू गटे, ओमप्रकाश श्रीराम निंबोने, सुनील लालबहादूर यादव, लखन मोहनसिंग यादव, राजेश संपत घोडेस्वार, रवींद्र रामचंद्र भैसारे, इंदलसिंग अश्रफीलाल यादव व जयसिंग अश्रफीलाल यादव हे आरोपी निर्दोष सुटले आहेत. ही घटना १६ जुलै २०१४ रोजी घडली होती.

देवलापार येथे गुप्ता यांचे विविध व्यवसाय आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले यादव कुटुंब त्यांचे स्पर्धक होते. त्यातून त्यांचे वेळोवेळी खटके उडत होते. पवनी येथील आठवडी बाजाराचे कंत्राट आधी गुप्ता यांच्याकडे होते. ते विक्रेत्यांकडून भाडे वसूल करीत हाेते. त्यानंतर ते कंत्राट यादव कुटुंबाला देण्यात आले. त्यावरूनही आरोपींचा गुप्तासोबत वाद झाला होता. घटनेच्या दिवशी आरोपींनी धनेश गुप्ता व त्यांचे भाऊ स्मित यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, तुफानसिंगने त्याच्याकडील बंदूक काढून धनेश यांच्यावर गोळीबार केला. परिणामी, त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे स्मितही गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन त्यांना अटक केली होती. न्यायालयात सरकारतर्फे विशेष ॲड. प्रशांत सत्यनाथन, आरोपींतर्फे वरिष्ठ ॲड. अविनाश गुप्ता व ॲड. आर. के. तिवारी तर, गुप्ता कुटुंबातर्फे ॲड. अशोक भांगडे यांनी कामकाज पाहिले.

नागरिकांनी केले होते आंदोलन

या घटनेनंतर देवलापार येथील नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी देवलापारसह पवनी व चोरबावली येथे आंदोलन केले होते. दरम्यान, चक्काजाम व जाळपोळही करण्यात आली होती. परिणामी, हे हत्याकांड राज्यभर चर्चेत आले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी