शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:20 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. हरिभाऊ केदार यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील ता. चिखली येथील गुंजाळा येथे शेतकरी कुटुंबात २९ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुलडाणा जिल्ह्यात, तर पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले आणि नागपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्यानंतर नागपूर नागरी शिक्षण मंडळाच्या शाळेत काही वर्षे शिक्षकी नोकरी गेली आणि पुढे ते ईश्वरबाबू शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक झाले.

१९६० ते १९९५ पर्यंत ते याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवेत राहिले. क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. शारीरिक शिक्षणाच्या उच्च शिक्षणासाठी काही वर्षे ते डेन्मार्क व नार्वे येथे राहिले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला. भारतीय स्काऊटचे मानद आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९८९ ते ९० या काळात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दोन वेळा पदभार सांभाळला. काही काळ ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष होते. ते नागपूर काँग्रेसचे काही काळ अध्यक्षही होते. ते नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले आणि काही वर्षे ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. डॉ. हरिभाऊ केदार यांचा गांधी-आंबेडकर विचारांवर प्रचंड विश्वास होता. नागपुरातील सर्वच पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा भक्कम आधार होता. त्यांची विवेकनिष्ठा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होती. ते आपल्या सामाजिक व वैचारिक बांधीलकीपासून कधीही परावृत्त झाले नाहीत.

मूलतत्त्ववाद आणि कट्टर धार्मिकतेला त्यांनी प्राणपणापासून विरोध केला. नागपुरातील दक्षिणायन चळवळीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात महात्मा गांधी यांचा पुतळा हटविल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते पुढे आले. संविधान चौकात झालेल्या अनेक सभांमध्ये त्यांनी हजेरी लावली. याच वर्षी ७ फेब्रुवारीला त्यांच्या ‘स्नेहबंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते.

..............

टॅग्स :Deathमृत्यू