शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:20 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य हरिभाऊ केदार यांचे बुधवारी रात्री पावणेदहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. हरिभाऊ केदार यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील ता. चिखली येथील गुंजाळा येथे शेतकरी कुटुंबात २९ मे १९३५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बुलडाणा जिल्ह्यात, तर पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले आणि नागपूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्यानंतर नागपूर नागरी शिक्षण मंडळाच्या शाळेत काही वर्षे शिक्षकी नोकरी गेली आणि पुढे ते ईश्वरबाबू शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक झाले.

१९६० ते १९९५ पर्यंत ते याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवेत राहिले. क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. शारीरिक शिक्षणाच्या उच्च शिक्षणासाठी काही वर्षे ते डेन्मार्क व नार्वे येथे राहिले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला. भारतीय स्काऊटचे मानद आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९८९ ते ९० या काळात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दोन वेळा पदभार सांभाळला. काही काळ ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष होते. ते नागपूर काँग्रेसचे काही काळ अध्यक्षही होते. ते नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातही सक्रिय राहिले आणि काही वर्षे ते स्थायी समितीचे अध्यक्षही होते. डॉ. हरिभाऊ केदार यांचा गांधी-आंबेडकर विचारांवर प्रचंड विश्वास होता. नागपुरातील सर्वच पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा भक्कम आधार होता. त्यांची विवेकनिष्ठा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होती. ते आपल्या सामाजिक व वैचारिक बांधीलकीपासून कधीही परावृत्त झाले नाहीत.

मूलतत्त्ववाद आणि कट्टर धार्मिकतेला त्यांनी प्राणपणापासून विरोध केला. नागपुरातील दक्षिणायन चळवळीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. २०१७ मध्ये मध्य प्रदेशात महात्मा गांधी यांचा पुतळा हटविल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते पुढे आले. संविधान चौकात झालेल्या अनेक सभांमध्ये त्यांनी हजेरी लावली. याच वर्षी ७ फेब्रुवारीला त्यांच्या ‘स्नेहबंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते.

..............

टॅग्स :Deathमृत्यू