शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी निकाली काढली ६१ हजारावर प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:57 IST

नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयात १६ वर्षे केले न्यायदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.ही माहिती न्यायालयातील सूत्रांकडून मिळाली असून त्याला नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय व्यवस्थापक अंजू शेंडे यांनी दुजोरा दिला. माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून २७ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. शेवटच्या दिवशी त्यांनी नागपूर खंडपीठात कार्य केले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने पब्लिक ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यांनी नागपूर खंडपीठातून सर्वाधिक ५० हजार ७७ प्रकरणे निकाली काढली. त्यात ४६ हजार ९ दिवाणी तर, ४ हजार ६८ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी औरंगाबाद खंडपीठातून ५ हजार ७९५ दिवाणी व १० फौजदारी अशी एकूण ५ हजार ८०५, मुंबई मुख्यालयातून १ हजार ७६६ दिवाणी व ३ हजार १२३ फौजदारी अशी एकूण ४ हजार ८८९ तर, पणजी (गोवा) खंडपीठातून ३३४ दिवाणी व ३६ फौजदारी अशी एकूण ३७० प्रकरणे निकाली काढली.धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विशेष न्यायिक कामकाज करता आले नाही. परंतु, त्यांनी प्रशासकीय सूत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले. त्याची सर्वत्र प्रशंसा झाली.बेंच प्रकरणेमुंंबई ४,८८९ (दिवाणी-१,७६६, फौजदारी-३,१२३)नागपूर ५०,०७७ (दिवाणी-४६,००९, फौजदारी-४,०६८)औरंगाबाद ५,८०५ (दिवाणी-५,७९५, फौजदारी-१०)पणजी ३७० (दिवाणी-३३४, फौजदारी-३६)एकूण ६१,१४१ (दिवाणी-५३,९०४, फौजदारी-७,२३७) 

 

टॅग्स :Courtन्यायालय