शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी निकाली काढली ६१ हजारावर प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:57 IST

नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयात १६ वर्षे केले न्यायदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.ही माहिती न्यायालयातील सूत्रांकडून मिळाली असून त्याला नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय व्यवस्थापक अंजू शेंडे यांनी दुजोरा दिला. माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून २७ एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. शेवटच्या दिवशी त्यांनी नागपूर खंडपीठात कार्य केले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने पब्लिक ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील प्रकरणावर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यांनी नागपूर खंडपीठातून सर्वाधिक ५० हजार ७७ प्रकरणे निकाली काढली. त्यात ४६ हजार ९ दिवाणी तर, ४ हजार ६८ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी औरंगाबाद खंडपीठातून ५ हजार ७९५ दिवाणी व १० फौजदारी अशी एकूण ५ हजार ८०५, मुंबई मुख्यालयातून १ हजार ७६६ दिवाणी व ३ हजार १२३ फौजदारी अशी एकूण ४ हजार ८८९ तर, पणजी (गोवा) खंडपीठातून ३३४ दिवाणी व ३६ फौजदारी अशी एकूण ३७० प्रकरणे निकाली काढली.धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विशेष न्यायिक कामकाज करता आले नाही. परंतु, त्यांनी प्रशासकीय सूत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले. त्याची सर्वत्र प्रशंसा झाली.बेंच प्रकरणेमुंंबई ४,८८९ (दिवाणी-१,७६६, फौजदारी-३,१२३)नागपूर ५०,०७७ (दिवाणी-४६,००९, फौजदारी-४,०६८)औरंगाबाद ५,८०५ (दिवाणी-५,७९५, फौजदारी-१०)पणजी ३७० (दिवाणी-३३४, फौजदारी-३६)एकूण ६१,१४१ (दिवाणी-५३,९०४, फौजदारी-७,२३७) 

 

टॅग्स :Courtन्यायालय