शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

वन सप्ताह; ना निधी आला, ना उद्दिष्ट ठरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:03 AM

१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काळात राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली होती. त्यातून दरवर्षी ३० कोटींवर झाडे लावण्यात आली. मात्र यंदा निधी आलेला नाही किंवा वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठरलेले नाही. एवढेच नाही तर यंदा फक्त ३३ टक्के खर्चाला मंजुरी आहे. झालेले वृक्षारोपण आणि नर्सरींच्या देखभालीच्या कामासाठीच ही रक्कम खर्ची होणार असल्याने यंदाची वृक्षारोपण मोहीम प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.१ जुलैपासून राज्यात वन सप्ताह सुरू झाला आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेला याच काळात प्रारंभ होत असतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नियमित उद्दिष्ट ठरते. त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून खड्ड्यांची कामे सुरू होतात. मात्र यंदा निधी आला नाही किंवा उद्दिष्टही ठरलेले नाही. नागपूर विभागात ही परिस्थिती आहे. राज्यातही जवळपास अशीच स्थिती आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये तर मागील वर्षीचा काही निधी मिळणे बाकी आहे.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील वृक्षारोपणासाठी निधीची मागणी नोंदविली आहे. सहायक मुख्य वनसंरक्षकांकडून बजेट मंजुरीसाठी जाते, नंतर ते सामाजिक वनीकरण विभागाला मिळते. यंदा प्रतीक्षा कायम आहे. सरकारच्या धोरणानुसार यंदा फक्त ३३ टक्के निधी मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नर्सरींच्या देखभालीवर आणि मागील वर्षीच्या वृक्ष लागवडीच्या संगोपनावर हा निधी प्राधान्यक्रमाने खर्च करावा लागणार आहे.नरेगाचा आधारमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वन विभागासाठी मिळणाºया निधीतूनच यंदाच्या वृक्षारोपणाची आखणी अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. वन विभागाकडून फक्त ५० हजार वृक्षांचीच लागवड होणार आहे. त्यामुळे खासगी संस्था, व्यक्ती, मंडळे, ग्रामपंचातयींच्या माध्यमातून वृक्षारोपणावर अधिक भर दिला जाणार आहे.नागपूर विभागात तीन लाख वृक्षांचे नियोजननागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये तीन लाख वृक्षलागवडीचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. सध्यातरी गतवर्षीची मिळून ३१ लाख रोपे उपलब्ध आहेत. २७ लाख रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. नर्सरीतून रोपांची विक्री करण्यासोबतच अन्य विभागांनाही पुरवठा केला जाणार आहे.नव्या योजनेचे परिपत्रक नाहीराज्य सरकारने यंदा वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचे अद्याप परिपत्रकच निघालेले नाही. योजनेचे उद्दिष्टही जाहीर झालेले नाही. १ जुलैपासून वनसप्ताह सुरू झाला असला तरी योजनेच्या घोषणेची प्रतीक्षाच आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार