शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

व्याघ्रचर्मासह वन्यजीवनिर्मित वस्तूंचा वन विभाग घेणार आढावा : उच्चस्तरीय आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:37 IST

वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ११ विभागात कामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे.वन मुख्यालयाच्या स्तरावरून राज्यभरातील सर्व ११ विभागांना यासंदर्भात पत्र मिळाले आहे. प्रत्येक विभागीयस्तरावर असलेल्या वनविभागांच्या कार्यालयांमध्ये वाघ, बिबट, हरीण यांच्या कातड्यांपासून तयार केलेले स्टॅच्यू किती आहेत, तसेच शिंगांपासून तयार केलेल्या ट्रॉफी किती आहेत, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. या सर्व वस्तूंचा एकत्रित अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मिळाल्या आहेत.यासोबतच कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या किती नागरिकांकडे वन्यप्राण्यांची कातडी आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू आहेत, याचीही माहिती मागविली आहे. या वस्तूंच्या मालकी हक्कासंदर्भात संबंधित नागरिकांना मिळालेल्या प्रमाणपत्रांची आणि संबंधित कागदपत्रांचीही माहिती यात मागविण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन्यप्राण्यांपासून तयार करण्यात आलेल्या ट्रॉफींची विक्री करता येत नाही. फक्त आपल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्याशी संबंधित व्यक्तीला अर्थात आपल्या वारसांनाच या वस्तू मिळू शकतात. मात्र यासंदर्भात वन विभागाला माहिती देणे आवश्यक असते. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.ट्रॉफी संवर्धनाचे काम सुरूनागपुरातील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयात वाघाची आणि डीसीएफ कार्यालयात हरणाची त्यांच्या कातड्यापासून तयार करण्यात आलेली प्रतिकृती आहे. त्यांच्या संवर्धनाचे काम या कार्यालयांकडून सुरू आहे.‘त्यांची’ वन विभाग दखल घेणारजिल्ह्यात अनेक कुटुंबांकडे वन्यप्राण्यांची शिंगे आणि त्यापासून तयार केलेल्या ट्रॉफी आहेत. अशा कुटुंबांना यापूर्वी वन विभागाकडून प्रमाणपत्र दिले आहेत. या मोहिमेमध्ये संबंधितांनी आपल्याकडील दस्तऐवज वन विभागाला सादर करायचा आहे. मालकी हक्काशी संबंधित दस्तऐवज सादर न करणाऱ्या नागरिकांची वन विभागाकडून दखल घेतली जाणार आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव