शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

व्याघ्रचर्मासह वन्यजीवनिर्मित वस्तूंचा वन विभाग घेणार आढावा : उच्चस्तरीय आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:37 IST

वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ११ विभागात कामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे.वन मुख्यालयाच्या स्तरावरून राज्यभरातील सर्व ११ विभागांना यासंदर्भात पत्र मिळाले आहे. प्रत्येक विभागीयस्तरावर असलेल्या वनविभागांच्या कार्यालयांमध्ये वाघ, बिबट, हरीण यांच्या कातड्यांपासून तयार केलेले स्टॅच्यू किती आहेत, तसेच शिंगांपासून तयार केलेल्या ट्रॉफी किती आहेत, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. या सर्व वस्तूंचा एकत्रित अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मिळाल्या आहेत.यासोबतच कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या किती नागरिकांकडे वन्यप्राण्यांची कातडी आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू आहेत, याचीही माहिती मागविली आहे. या वस्तूंच्या मालकी हक्कासंदर्भात संबंधित नागरिकांना मिळालेल्या प्रमाणपत्रांची आणि संबंधित कागदपत्रांचीही माहिती यात मागविण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन्यप्राण्यांपासून तयार करण्यात आलेल्या ट्रॉफींची विक्री करता येत नाही. फक्त आपल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्याशी संबंधित व्यक्तीला अर्थात आपल्या वारसांनाच या वस्तू मिळू शकतात. मात्र यासंदर्भात वन विभागाला माहिती देणे आवश्यक असते. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.ट्रॉफी संवर्धनाचे काम सुरूनागपुरातील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालयात वाघाची आणि डीसीएफ कार्यालयात हरणाची त्यांच्या कातड्यापासून तयार करण्यात आलेली प्रतिकृती आहे. त्यांच्या संवर्धनाचे काम या कार्यालयांकडून सुरू आहे.‘त्यांची’ वन विभाग दखल घेणारजिल्ह्यात अनेक कुटुंबांकडे वन्यप्राण्यांची शिंगे आणि त्यापासून तयार केलेल्या ट्रॉफी आहेत. अशा कुटुंबांना यापूर्वी वन विभागाकडून प्रमाणपत्र दिले आहेत. या मोहिमेमध्ये संबंधितांनी आपल्याकडील दस्तऐवज वन विभागाला सादर करायचा आहे. मालकी हक्काशी संबंधित दस्तऐवज सादर न करणाऱ्या नागरिकांची वन विभागाकडून दखल घेतली जाणार आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव