शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाला ‘जय’चा घोर

By admin | Updated: July 23, 2016 03:23 IST

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

पाच पथके रवाना : पीसीसीएफची माहिती नागपूर : गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अक्षरश: झोप उडविली आहे. विशेष म्हणजे, याच कार्यालयाने मोफतची प्रसिद्धी लाटण्यासाठी ‘जय’ ला हिरो बनविले होते. परंतु त्याचा शोध घेणे, या विभागाला डोईजड झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’वरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले आहे. शिवाय उलटसुलट चर्चेला उथाण आले आहे. या सर्व चर्चेवर पांघरुण घालण्यासाठी शुक्रवारी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने घाईगर्दीत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांची पत्रपरिषद आयोजित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्री भगवान यांनी ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला जंगलाबाहेर गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. सोबतच त्यांनी ‘जय’ चा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचेही सांगितले. यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केले असून, या प्रत्येक पथकात प्रत्येकी पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके भंडरा, पवनी, नागझिरा, गोंदिया, वडसा व गडचिरोलीपर्यंतच्या जंगलात शोध घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वाईल्डलाईफचे (डब्ल्यूआयआय) डॉ. बिलाल हबीब यांनी ‘जय’ ला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी ‘जय’ चा अधिवास हा इतर वाघांच्या तुलनेत फार मोठा राहिला असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, इतर कोणताही वाघ हा साधारण १०० ते १५० चौ. किलो मीटरच्या परिसरात फिरतो. मात्र जय हा तब्बल ५८० चौ. किलोमीटर परिसरात फिरत होता. या तुलनेत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे क्षेत्र केवळ १९० चौ. किलो मीटर एवढे आहे. त्यामुळे तो यापूर्वी सुद्धा अनेकदा या जंगलातून बाहेर गेला आहे. मात्र तो १५ ते एक महिन्यात पुन्हा परत आला. परंतु मागील १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी येथे त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय मागील २५ नोव्हेंबर २०१५ रोजी बंद पडलेली रेडिओ कॉलर ही जपानमधील कंपनीकडे परत पाठविण्यात आली असून, तिचा रिपोर्ट आल्यानंतरच ती बंद का पडली ते सांगता येईल, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी व विभागीय वन अधिकारी गिरीश उपस्थित होते. (प्रतिनिधी)