शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

वन विभागाला ‘जय’चा घोर

By admin | Updated: July 23, 2016 03:23 IST

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

पाच पथके रवाना : पीसीसीएफची माहिती नागपूर : गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अक्षरश: झोप उडविली आहे. विशेष म्हणजे, याच कार्यालयाने मोफतची प्रसिद्धी लाटण्यासाठी ‘जय’ ला हिरो बनविले होते. परंतु त्याचा शोध घेणे, या विभागाला डोईजड झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’वरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले आहे. शिवाय उलटसुलट चर्चेला उथाण आले आहे. या सर्व चर्चेवर पांघरुण घालण्यासाठी शुक्रवारी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने घाईगर्दीत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांची पत्रपरिषद आयोजित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्री भगवान यांनी ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला जंगलाबाहेर गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. सोबतच त्यांनी ‘जय’ चा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचेही सांगितले. यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केले असून, या प्रत्येक पथकात प्रत्येकी पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके भंडरा, पवनी, नागझिरा, गोंदिया, वडसा व गडचिरोलीपर्यंतच्या जंगलात शोध घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वाईल्डलाईफचे (डब्ल्यूआयआय) डॉ. बिलाल हबीब यांनी ‘जय’ ला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी ‘जय’ चा अधिवास हा इतर वाघांच्या तुलनेत फार मोठा राहिला असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, इतर कोणताही वाघ हा साधारण १०० ते १५० चौ. किलो मीटरच्या परिसरात फिरतो. मात्र जय हा तब्बल ५८० चौ. किलोमीटर परिसरात फिरत होता. या तुलनेत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे क्षेत्र केवळ १९० चौ. किलो मीटर एवढे आहे. त्यामुळे तो यापूर्वी सुद्धा अनेकदा या जंगलातून बाहेर गेला आहे. मात्र तो १५ ते एक महिन्यात पुन्हा परत आला. परंतु मागील १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी येथे त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय मागील २५ नोव्हेंबर २०१५ रोजी बंद पडलेली रेडिओ कॉलर ही जपानमधील कंपनीकडे परत पाठविण्यात आली असून, तिचा रिपोर्ट आल्यानंतरच ती बंद का पडली ते सांगता येईल, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी व विभागीय वन अधिकारी गिरीश उपस्थित होते. (प्रतिनिधी)