शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वन विभागाला ‘जय’चा घोर

By admin | Updated: July 23, 2016 03:23 IST

गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे.

पाच पथके रवाना : पीसीसीएफची माहिती नागपूर : गत तीन वर्षे वन विभागातील ज्या वन अधिकाऱ्यांनी ‘जय’ च्या भरवशावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली, आज तोच ‘जय’ या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. या वाघाने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अक्षरश: झोप उडविली आहे. विशेष म्हणजे, याच कार्यालयाने मोफतची प्रसिद्धी लाटण्यासाठी ‘जय’ ला हिरो बनविले होते. परंतु त्याचा शोध घेणे, या विभागाला डोईजड झाले आहे. मागील तीन महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’वरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले आहे. शिवाय उलटसुलट चर्चेला उथाण आले आहे. या सर्व चर्चेवर पांघरुण घालण्यासाठी शुक्रवारी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने घाईगर्दीत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांची पत्रपरिषद आयोजित करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान श्री भगवान यांनी ‘जय’ हा उमरेड-कऱ्हांडला जंगलाबाहेर गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. सोबतच त्यांनी ‘जय’ चा युद्धपातळीवर शोध घेतला जात असल्याचेही सांगितले. यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केले असून, या प्रत्येक पथकात प्रत्येकी पाच लोकांचा समावेश आहे. ही सर्व पथके भंडरा, पवनी, नागझिरा, गोंदिया, वडसा व गडचिरोलीपर्यंतच्या जंगलात शोध घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ वाईल्डलाईफचे (डब्ल्यूआयआय) डॉ. बिलाल हबीब यांनी ‘जय’ ला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरची सविस्तर माहिती दिली. शिवाय त्यांनी ‘जय’ चा अधिवास हा इतर वाघांच्या तुलनेत फार मोठा राहिला असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, इतर कोणताही वाघ हा साधारण १०० ते १५० चौ. किलो मीटरच्या परिसरात फिरतो. मात्र जय हा तब्बल ५८० चौ. किलोमीटर परिसरात फिरत होता. या तुलनेत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे क्षेत्र केवळ १९० चौ. किलो मीटर एवढे आहे. त्यामुळे तो यापूर्वी सुद्धा अनेकदा या जंगलातून बाहेर गेला आहे. मात्र तो १५ ते एक महिन्यात पुन्हा परत आला. परंतु मागील १८ एप्रिल २०१६ रोजी पवनी येथे त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले असून, तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय मागील २५ नोव्हेंबर २०१५ रोजी बंद पडलेली रेडिओ कॉलर ही जपानमधील कंपनीकडे परत पाठविण्यात आली असून, तिचा रिपोर्ट आल्यानंतरच ती बंद का पडली ते सांगता येईल, असे ते म्हणाले. या पत्रपरिषदेला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी व विभागीय वन अधिकारी गिरीश उपस्थित होते. (प्रतिनिधी)