शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

सोनेरी सुखासाठी...‘जुळून आल्या रेशीमगाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 08:00 IST

Nagpur News श्रद्धानंद अनाथाश्रमातील पाच जणींचे विवाह ठरले असून त्या आपल्या नव्या आयुष्यात पदार्पण करणार आहेत.

ठळक मुद्दे ‘त्या’ पाच जणी अनाथालयाचे माहेर साेडून जाणार सासरी

नागपूर : मेहंदी लागली. आज हळद लागेल अन् उद्या लग्नसोहळा पार पडून सप्तपदी घेतील अन् ‘त्या’ पाच जणींच्या आयुष्याची रेशीमगाठ बांधली जाईल. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथाश्रम सध्या आनंदाने फुलले आहे आणि पाचही जणी माहेरपण सोडून सासरी जाणार असल्याने हुरहूर ही राहणार आहे. पण, अनाथ म्हणून असलेली ओळख कायमची मिटणार आहे. इथून त्यांचे आयुष्यच नवे वळण घेणार आहे. एका अर्थाने त्यांच्यासाठी हा नवा जन्मच जणू.

आजवर अनाथ म्हणूनच जगणाऱ्या या मुलींना अनाथालयाचा आधार, माया आणि त्यांच्यासारख्याच मुलांची साेबत हाेती. मात्र हक्काची म्हणावी ते आईवडील आणि आपले म्हणावे असे हक्काचे घर नव्हते. ही आपलेपणाची भावना पहिल्यांदा त्यांना आता मिळणार आहे. आपला म्हणावा असा जाेडीदार, त्याचे आईवडील, नातेगाेते आणि हक्काचे म्हणावे ते घरही त्यांच्यासाठी आनंदपर्व राहणार आहे.

श्रद्धानंद अनाथालयाच्या दारात मांडव सजला आहे. गुरुवारी थाटात मेहंदी साेहळा पार पडला. पाच भावी वधूंसह अनाथालयातील चिमुकल्यांचेही हात मेहंदीने रंगले. शुक्रवारी हळद आणि संगीत कार्यक्रम हाेणार आहे आणि १८ जून राेजी सकाळी १०.३० वाजता थाटात लग्नसाेहळा पार पडणार आहे. अनाथालयासाठी ही वेळ जेवढी आनंदाची तेवढीच हृदय दाटून येणारी आहे. इतके वर्षे या अनाथाश्रमाच्या आधाराने राहणाऱ्या या पाच मुली हे माहेर साेडून सासरी जाणार आहेत. २३ वर्षांची मनीषा २१ वर्षांची उषा व संताेषी, २५ वर्षांची सेविका यांना येथे आणले तेव्हा त्या एक-दाेन वर्षाच्या अबाेध बालिका हाेत्या. सीमाला १२व्या वर्षी दुसऱ्या अनाथाश्रमातून येथे आणले हाेते. तेव्हापासून त्यांचे पालनपाेषण, शिक्षण, आराेग्य येथे झाले. लहानपणी चालण्याचा त्रास असलेल्या सेविकाच्या पायाचे २००४ व २००८ मध्ये दाेन ऑपरेशन झाले. सीमाच्या डाेळ्याचे ऑपरेशन झाले. अठरावे पूर्ण केल्यानंतर या मुलींना आधारगृहात दाखल करण्यात आले. इतकी वर्षे या ठिकाणी राहणाऱ्या या पाचही जणी कर्मचाऱ्यांसाठी मुली, चिमुकल्या अनाथांसाठी ताई आणि कुणाच्या मैत्रिणी झाल्या. चांगल्या वाईट असंख्य आठवणी असतील. या सगळ्या आठवणी साेबत घेऊन त्या नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. मग येथील प्रत्येकाच्या भावना दाटून येणार नाहीत तर नवलच.

यांच्याशी हाेणार विवाह

मनीषाचा विवाह धरणगाव, मलकापूर, जि. बुलडाणातील मुलाशी हाेणार आहे. उषाचे लग्न यवतमाळचे दिनेश भेंडारकर यांच्याशी, सेविकाचे लग्न मध्य प्रदेशातील कपिल शर्मा यांच्याशी, संताेषी ही खामला येथील सचिन भाेयर यांच्याशी तर सीमाचे लग्न उमाळी, जि. बुलडाणाचे सतीश धाेरण यांच्याशी हाेणार आहे. अनाथालयाच्या कर्मचाऱ्यांनी वधू पक्षाच्या कुटुंबाप्रमाणे आवश्यक असलेला पाठपुरावा, कागदपत्र व आराेग्य तपासणी करूनच लग्न ठरविल्याची माहिती अर्चना मेश्राम यांनी दिली.

हे करणार कन्यादान

शहरातील प्रतिष्ठित किशाेर धाराशिवकर, राजकुमार गुप्ता, दीपा पचाेरी, मनीषा यमसनवार व पाले बलजीत भुल्लर हे पाचही मुलींचे कन्यादान करणार आहेत. काही दानदात्यांनी मुलींच्या नावे एफडी केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशाेमती ठाकूर या आवर्जून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे पदाधिकारी आणि अनाथालयाचे कर्मचारी उत्साहाने या विवाहसाेहळ्याच्या तयारीला लागले आहेत.

टॅग्स :marriageलग्न